Ajit Pawar, Sharad Pawar, Supriya Sule sararnama
पुणे

Ajit Pawar News : साहेबांना दैवत मानत होतो, ताईंबाबत 17 वर्षांनी प्रकाश पडला, नेमकं काय म्हणायचंय दादांना !

Sudesh Mitkar

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचार आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. त्यामुळे नेत्यांकडून वैयक्तिक पातळीवरती जाऊन टीका होऊ लागली आहेत. बारामतीमध्ये पवार कुटुंबीय आमने-सामने असल्याने शरद पवार आणि अजित पवार गटांमध्ये आरोपप्रत्यारोपाचं राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त बुधवारी अजित पवार यांच्या हस्ते पुण्यात ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांचे संवाद साधत विविध गोष्टींवर भाष्य केलं आहे. पवार म्हणाले, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी योगदान दिले त्यांना अभिवादन करतो. ज्यावेळेस अधिवेशन असतं त्या त्या वेळी बेळगावचा प्रश्न मांडला जातो. सुप्रीम कोर्टात हे प्रकरण सुरू आहे. आपल्याला सुप्रीम कोर्टाला जाब विचारण्याचा अधिकार नाही. बेळगाव भागातील मराठी भाषिकांना ज्या सवलती देता येतील त्या सरकारकडून दिल्या जात आहेत. सुप्रीम कोर्टात सरकारने चांगले वकील लावले आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'भटकती आत्मा' अशा प्रकारचा शब्दप्रयोग करून शरद पवारांवरती निशाणा साधला असल्याचे बोलले जात आहे. याबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) कोणाला उद्देशून म्हटले ते मला माहिती नाही. मी त्या सभेमध्ये होतो. पुढच्या सभेत मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल तेव्हा मी मोदी साहेबांना विचारेल. भटकती आत्मा हा उल्लेख कोणाला डोळ्यासमोर ठेवून केला आहे.

काही राज्यांमध्ये एका टप्प्यात निवडणूक होत असताना महाराष्ट्रामध्येच पाच टप्प्यांमध्ये निवडणुका का? असं सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला होता. त्याबाबत अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले, माझ्या ज्ञानानुसार निवडणूक आयोग याला स्वायत्तता दिली आहे. निवडणूक आयोगाने किती टप्प्यात निवडणुका घ्याव्यात हा त्यांचा अधिकार आहे. यात कोणी लुडबुड करू शकत नाही. महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या आहेत. देशात 7 टप्प्यात निवडणुका आहेत.

मेहेर कोटेजा यांच्यावर झालेल्या दगडफेकी बाबत बोलताना अजित पवार म्हणाले, याबाबतची बातमी मी सकाळी वाचली. नक्की काय झालं याची माहिती घेईल. खुल्या वातावरणात निवडणुका झाल्या पाहिजेत. कुठल्याही प्रकारे निवडणूक आचारसंहितेचा भंग होणार नाही. याची सर्व राजकीय पक्षांनी कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी. बारामती (Baramati) मध्ये कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप अजित पवार यांच्यावरती होत आहे. त्यावर बोलताना ते म्हणाले, मी कुणाला धमकी दिली नाही. आज विरोधकाकडे कुठलाही मुद्दा राहिला नाही. आमच्या बद्दल गैरसमज पसरवला जात आहे. आम्ही त्यांच्याबरोबर असतानाही कधी धमक्या दिल्या नाही.

शरद पवार यांनी केलेला टीकेबाबत अजित पवार यांना विचारला असता ते म्हणाले, मी एक वेगळा रस्ता स्वीकारला आहे. मी एकेकाळी त्यांना दैवत म्हणून मानत होतो. त्यांच्या स्टेटमेंट बद्दल मी काय बोलावं एवढा मोठा मी नाही. सुप्रिया सुळे यांनी एका भाषणात दरम्यान मी कार्यक्षम आहे का नाही हे कळण्यासाठी अजित पवार यांना 17 वर्षे लागली का? असा सवाल केला होता त्याला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, हो याबाबत आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्षे लागली आहेत.

अजित पवारांना खडकवासल्यामध्ये सोसायटीमध्ये जाऊन प्रचार करावा लागतोय यावरून विरोधक निशाणा साधत आहेत. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला जनतेत राहून काम करायला आवडतं. सोसायटीत जाऊन मी लोकांशी बोलतोय. मी वरच्या स्तरावर पंतप्रधानां बरोबर ही सभा घेऊ शकतो. मी स्वतःला मोठा समजत नाही. मला कमीपणा वाटत नाही.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT