INDIA Alliance: नितीश कुमार, ममता यांच्यानंतर आता 'या' नेत्याच्या खाद्यांवर येणार 'ही' मोठी जबाबदारी; BJP विरोधात मैदानात उतरणार

Opposition Strategy Against BJP Akhilesh Yadav: हरियाणा, दिल्ली मधील पराभवानंतर इंडिया आघाडी अँक्शन मोडमध्ये आली आहे. इंडिया आघाडीत कुणीतरी नेता समन्वयकाच्या भूमिकेत असला पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली आहे.
Opposition Strategy Against BJP Akhilesh Yadav
Opposition Strategy Against BJP Akhilesh YadavSarkarnama
Published on
Updated on

INDIA Alliance Latest News: लोकसभा निवडणुकी पूर्वी अस्तिवात आलेली इंडिया आघाडीत काही महिन्यातच फूट पडली. त्यांचा परिणाम नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत बसला.

दिल्ली विधानसभेत इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आम आदमी पार्टीचा सुपडा साफ झाला आहे. यापूर्वीही झालेल्या हरियाणा आणि महाराष्ट्रमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला आहे.

या पराभवानंतर इंडिया आघाडीतील घटकपक्षांनी आत्मपरिक्षण करण्यास सुरवात केली आहे. अनेक नेत्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. काँग्रेसमुळे इंडिया आघाडी मजबूत झाली नाही, असा आरोप नेत्यांनी केला आहे.

इंडिया आघाडीत दोन मोठे पक्ष आम आदमी पक्ष आणि काँग्रेस यांनी स्वतंत्र्यपणे निवडणुका लढवल्या आहेत. त्यांचा फायदा भाजपला झाला. हरियाणातही या दोन्ही पक्षानी स्वतंत्रपणे निवडणुका लढल्यामुळे भाजपला सत्ता स्थापनेचा मार्ग सोपा झाला.

Opposition Strategy Against BJP Akhilesh Yadav
Tuhin Kanta Pandey: माधबी पुरी बुच यांची जागा घेणारे कोण आहेत SEBIचे नवे प्रमुख तुहिन कांत पांडे

हरियाणा, दिल्ली मधील पराभवानंतर इंडिया आघाडी अँक्शन मोडमध्ये आली आहे. इंडिया आघाडीत कुणीतरी नेता समन्वयकाच्या भूमिकेत असला पाहिजे, अशी मागणी जोर धरु लागली आहे. याता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री, टीएमसी नेत्या ममता बॅनर्जी यांचे नाव आघाडीवर होते, त्यांनीही जाहीरपणे आपण नेतृत्व करण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते.

काँग्रेच्या भूमिकेवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते. जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी इंडिया आघाडीच्या भविष्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

Opposition Strategy Against BJP Akhilesh Yadav
Kalyan Singh: उत्तरप्रदेशात हिंदुत्व रुजवणारा भाजपचा सर्वात मोठा चेहरा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या वेळी तर आपचे नेता, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी इंडिया आघाडीतून काँग्रेसची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली होती.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी इंडिया आघाडीत सहभागी करुन भाजपच्या विरोधात आघाडी उघडण्यासाठी सुरुवातीला प्रयत्न केला होता, पण ते भाजपसोबत गेले. अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांची आपआपल्या राज्यात काँग्रेससोबत वाद आहेत.

या घडामोडीनंतर आता इंडिया आघाडीचे नेतृत्व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे करतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

याला सपाचे ज्येष्ठ नेते रविदास मेहरोत्रा यांनी दुजोरा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत सपाचे 37 खासदार निवडून आल्याने तो मोठा पक्ष ठरला आहे, त्यामुळे इंडिया आघाडीचे नेतृत्व हे अखिलेश यादव यांच्याकडे जाईल, याची शक्यता अधिक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com