
New Delhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची दोन दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील प्रसिध्द कपूर कुटुंबातील सदस्यांनी दिल्लीत भेट घेतली. या भेटीवरून राजकारण सुरू झाले असून काँग्रेसने पंतप्रधानांना टोला लगावला आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काँग्रेसच्या खासदारांनी मणिपूरचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.
कपूर कुटुंबियांकडून राज कपूर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव 13 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त कपूर कुटुंबातील सदस्यांनी मंगळवारी पंतप्रधानांची दिल्लीत भेट घेतली. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. या भेटीवरून काँग्रेसचे नेते पवन खेडा यांनी पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.
पवन खेडा यांनी एक्सवर याबाबत पोस्ट करत म्हटले आहे की, ‘आम्ही म्हणालो मणिपूर, त्यांना वाटले करिना कपूर.’ खेडा यांची ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर त्यांनी ते काही वेळातच डिलिट केले आहे. त्यांच्या पोस्टमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याते ते डिलिट केल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपूर्वी मणिपूरमध्ये पुन्हा हिंसेच्या घटना घडल्या. हा मुद्दा काँग्रेसकडून संसदेत उपस्थित करत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधण्यात आला होता. पंतप्रधान मणिपूरमध्ये कधी जाणार, असा सवाल करण्यात आला होता. त्यावर संसदेच चर्चेची मागणीही काँग्रेसकडून केली जात आहे.
मागील वर्षी मे महिन्यापासून राज्य धुमसत आहे. आजपर्यंत एकदाही पंतप्रधान मोदींना या राज्याचा दौरा केलेला नाही, असा मुद्दा काँग्रेसकडून मांडला जात आहे. राज्यात आतापर्यंत या हिंसाचारात 258 जणांचा मृत्यू झाला आहे. मैतई आणि कुकी समाजामध्य सातत्याने संघर्ष होत आहे. त्यामुळे सरकारने या राज्यांत सुरक्षा दलाच्या तुकड्या वाढवल्या आहेत. सध्या स्थिती नियंत्रणात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.