Arvind Kejriwal : दिल्लीत ‘आप’ पुन्हा जिंकले तरी केजरीवाल CM पदापासून दूरच! काय आहे कारण?

Delhi Assembly Election AAP Supreme Court Delhi Liquor Policy Scam Sandeep Dixit : अरविंद केजरीवाल यांना कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी ईडीने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती.
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : आम आदमी पक्षान दिल्लीत पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे. सर्व मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली जोरदार शक्तीप्रदर्शन केले जात आहे. पण असे असले तरी आपची पुन्हा सत्ता आली तरी केजरीवाल मुख्यमंत्रिपदाचा खुर्चीवर बसू शकणार नाहीत, अशी चर्चा आहे.

काँग्रेसचे नेते व केजरीवाल यांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरलेले संदीप दीक्षित यांनी हा दावा केला आहे. कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणात केजरीवाल हे सध्या सुप्रीम कोर्टाने मंजूर केलेल्या जामिनामुळे जेलबाहेर आहेत. त्यांना लोकसभा निवडणुकीआधी ईडीने याप्रकरणी अटक केली होती. काही महिने ते तुरुंगात होते.

Arvind Kejriwal
Parliament Winter Session : मोठी बातमी! संसद आवारात खासदारांमधील धक्काबुक्की प्रकरणी आता 'SIT' गठीत

याचपार्श्वभूमीवर दीक्षित यांनी हा दावा करताना म्हटले आहे की, जामीन देताना कोर्टाने काही अटी व शर्ती घातल्या आहेत. त्यानुसार त्यांना कोणत्याही अधिकृत कागदपत्रांना सही करण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. केजरीवाल मुख्यमंत्री बनल्यास आणि सरकारी फायलींवर सह्या केल्यास जामिनाच्या अटींचे उल्लंघन होईल. त्यामुळे त्यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागू शकते. त्यामुळे ते दिल्लीचे मुख्यमंत्री बनू शकत नाहीत.

दरम्यान, दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवालांविरोधात खटला चालवण्याची परवानगी दिली आहे. ईडीने पाच डिसेंबर रोजी नायब राज्यपालांकडे याबाबतचा परवानगी मागितली होती. त्यावर सक्सेना यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर केजरीवालांच्या अडचणी वाढणार आहेत.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal Video : आंबेडकरांच्या अवमानावरून राजकारण तापले; केजरीवालांनी केली मोठी घोषणा, म्हणाले 'दलित विद्यार्थ्यांना...'

केजरीवालांची मजबूरी

तुरुंगातून जामिनावर बाहेर आल्यानंतर केजरीवालांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. खरं तर हा कोणताही त्याग वगैरे नव्हता तर त्यांची मजबूरी होती. जेलमध्ये असताना राज्याचा कारभार त्यांना हाकता येत नव्हता. तर जेलबाहेर आल्यानंतरही कोर्टाने घातलेल्या अटींमुळे त्यांना फायलींवर सह्या करता येणार नव्हत्या. निवडणुकीच्या तोंडावर सरकारी कामकाज रेंगाळू नये, म्हणून त्यांना नाईलाजास्तव राजीनाम्याचा निर्णय घेत आतिशी यांना मुख्यमंत्री करावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com