
New Delhi Live : भाजपचे राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे यांनी मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मृत्यूबाबत मोठा दावा केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना काँग्रेसवर निशाणा साधताना बोंडे यांनी हा दावा केला आहे. त्यांनी डमी बापू, लिब्रांडू असे शब्द वापरल्याने राज्यसभेत वादही निर्माण झाला.
अनिल बोंडे यांनी राज्यसभेत मंगळवारी 17 मिनिटे भाषण केले. बोंडे यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बोलताना मोदींच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. जवळपास 17 मिनिटांच्या भाषणात त्यांनी महाराष्ट्रातील विकासासह दिल्लीतील असुविधांचा उल्लेख करून त्यावरून आम आदमी पक्षावर निशाणा साधला. तसेच आंबेडकरांच्या मृत्यूबाबतही त्यांना दावा केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवडणुकीविषयीच्या धनंजय कीर यांच्या लेखनाचा संदर्भ देताना बोंडेनी सांगितले की, पंतपधान नेहरू असताना निवडणूक आयोगाने आंबेडकरांची 78 हजार मते अवैध ठरवली होती. नेहरू दोनदा विरोधात प्रचारासाठी गेले होते. जयप्रकाश नारायण यांनीही संशय व्यक्त केला होता. आंबेडकरांना केवळ प्रचार करून हरवले नाही तर 78 हजार मते अवैध ठरवून हरवण्यात आले.
एकदा पराभव झाल्यानंतर आंबेडकर आजारी पडले होते, त्यांना डायबिटीज सुरू झाला. भंडाराच्या पोटनिवडणुकीतही काँग्रेसने आंबेडकरांचा पराभव केला. तिथेही पंतप्रधान प्रचाराला गेले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दत्तोपंत ठेंगडे यांनी आंबेडकरांचा प्रचार केला होता. 1954 मध्ये पराभवाचा मोठा धक्का आंबेडकरांना बसला होता. हा धक्का बसल्यानंतर 1956 मध्ये आंबेडकर हे जग सोडून गेले. ते दोन पराभव त्यांच्या मृत्यूला जबाबदार होते, असे बोंडे म्हणाले.
आंबेडकरांच्या मृत्यूलाही हे दोन पराभव जे काँग्रेसने जाणीवपूर्वक केले होते, तेच जबाबदार होते. महाराष्ट्रात जे बोलले जात होते तेच मी सांगत आहे, असा मोठा दावा बोंडे यांनी यावेळी केला. बोंडे यांनी विरोधकांवर टीका करताना लिब्रांडू या शब्दाचा वापर केल्याने गोंधळ निर्माण जाला. गोपालदास नीरज यांचा संदर्भ देत बोंडे यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. 2014 मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी विराजमान झाल्यानंतर खूपसारे लिब्रांडू... असे बोंडे म्हणताच विरोधी बाकांवरील सदस्य त्याविरोधात आक्रमक झाले होते.
वाद होताच बोंडे यांनी लिब्ररल हा शब्द वापरला. उपसभापतींनी विरोधी सदस्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. गोंधळातच बोंडे यांनी पुढे आपले भाषण सुरू ठेवले. पुरस्कार वापसीवरून बोंडे यांनी विरोधकांवर टीका केली.
त्यानंतर काही वेळात तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांनी बोंडे यांनी उच्चारलेल्या त्या शब्दावर आक्षेप घेतला. तो शब्द सभागृहाचा अपमान करणारा असल्याचे गोखले म्हणाले. अशा शब्दांचा सभागृहात वापर व्हायला नको, अशी नाराजीही गोखले यांनी व्यक्त केली. त्यावर उपसभापतींनी रेकॉर्ड तपासून तो शब्द असंसदीय असेल तर कामकाजातून वगळण्यात येईल, असे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.