Arvind Kejriwal : निवडणुकीआधी केजरीवाल नव्या अडचणीत? निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस अन् मागितला पुरावा

Election Commission Notice to Arvind Kejariwal : जाणून घ्या, नेमकं काय आहे प्रकरण आणि केजरीवालांना निवडणूक आयोगाने कशाचा पुराव मागितला आहे
Arvind Kejriwal
Arvind KejriwalSarkarnama
Published on
Updated on

Aam Aadmi Party News: आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी हरियाणामधील भाजप सरकारवर यमुना नदीचे पाणी विषारी केल्याचा आरोप केला होता. यानंतर आता निवडणूक आयोगाने केजरीवालांना नोटीस पाठवली आहे आणि आज(बुधवार) पुरावा सादर करण्यास सांगितले आहे.

निवडणूक आयोगाने आम आदमी पार्टीचे (AAP) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांना, यमुना नदीत विष टाकणे आणि सामूहिक नरसंहाराच्या त्यांच्या गंभीर आरोपांना पुराव्यानिशी सिद्ध करण्यास सांगितले आहे. निवडणूक आयोगाने विविध न्यायालयीन निर्णय आणि कायदेशीर तरतुदींचा हवाला दिला आहे. ज्या अंतर्गत राष्ट्रीय एकात्मता आणि सार्वजनिक सौहार्दाविरुद्ध अशा विधानांबद्दल तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

आयोगाने म्हटले की, अशाप्रकारच्या आरोपांमुळे प्रादेशिक समूह आणि शेजारील राज्यांमधील निवासींविरोधत शत्रूत्व निर्माण होणे, पाण्याची वास्तविक किंवा कथित कमतरता अथवा अनुब्धतेच्या कारणाने कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत धोका निर्माण होण्याचा गंभीर परिणाम होतो.

Arvind Kejriwal
Rahul Gandhi on Arvind Kejriwal : भाजपनंतर आता राहुल गांधींचाही 'शीश महल'वरून केजरीवालांना टोला, म्हणाले...

आयोगाने 29 जानेवारी 2025 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत तक्रारींवर आपला जवाब देण्याचे निर्देश दिले आहेत. विशेष करून तथ्यात्मक आणि कायदेशीर बाबींसह पुराव्यांचा आधार घेऊन जेणेकरून आयोग या प्रकरणाची चौकशी करून योग्य कारवाई करू शकेल.

हरियाणा सरकार दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करणार आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांनी कडक शब्दात सांगितले की, अरविंद केजरीवाल यांनी हरियाणा आणि दिल्लीच्या जनतेची तात्काळ माफी मागावी, जर त्यांनी तसे केले नाही तर हरियाणा सरकार त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल करेल. त्यांनी हरियाणाविरुद्ध केलेल्या निराधार, लज्जास्पद, बनावट आणि खोट्या आरोपांबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार नाही तर त्यांच्याविरुद्ध मानहानीचा खटलाही दाखल करू. आज केजरीवाल यांनी ज्या भूमीत जन्म घेतला त्या भूमीचा अपमान केला आहे

Arvind Kejriwal
BJP - Congress Donation News : लोकसभेआधी भाजपला मिळाली तब्बल 3 हजारांहून अधिक कोटींची देणगी, तर काँग्रेसला...

केजरीवाल काय म्हणाले? -

अरविंद केजरीवाल म्हणाले होते की हरियाणाच्या भाजप सरकारने यमुनेच्या पाण्यात विष मिसळले आहे. दिल्ली जल बोर्डाच्या सतर्कतेमुळे विषारी पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्यापासून रोखले गेले. जर हे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळून दिल्लीत शिरले असते तर दिल्लीतील अनेक लोकांचा मृत्यू झाला असता. यामुळे मोठ्या प्रमाणात कत्तल झाली असती. केजरीवाल यांच्या या विधानानंतर बराच वादंग पाहायला मिळत आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com