India Vs Pakistan: भारताची शान असलेल्या 'INS विक्रांत'चा पाकिस्तानला पहिला मोठा दणका; काही मिनिटांतच कराची बंदर उध्वस्त

India Attack On Pakistan: भारताचे तीनही सैन्य दल अ‍ॅक्शन मोडवर आले असून हवाई,आर्मीनंतर आता नौदलाकडूनही पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे.
India-Pakistan
India-Pakistan sarkarnama
Published on
Updated on

New Delhi News :'ऑपरेशन सिंदूर'नंतरदेखील बिथरलेल्या पाकिस्ताननं जम्मू,पठाणकोट,जैसलमेर, होशियारपूरमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण हे हल्ले हाणून पाडताना भारतानं पाकचे 8 ड्रोन नेस्तनाबूत करण्यात आले. यानंतर भारताचे तीनही सैन्य दल (Indian Army) अॅक्शन मोडवर आले असून हवाई,आर्मीनंतर आता नौदलाकडूनही पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे.

भारतीय हवाई दलानं पाकिस्तानची (Pakistan) राजधानी इस्लामाबादसह,लाहोर कराची, रावळपिंडी, सियालकोट एकूण 7 शहरांवर हल्ले करण्यात आले आहेत.तर सीमारेषेवरही भारतीय जवान अलर्ट मोडवर असतानाच तिकडे नौदलासह भारताची शान असलेल्या आयएनएस विक्रांतमधून अरबी समुद्रातून पाकिस्तानवर मोठा हल्ला करण्यात आला आहे.

भारताने पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे.शिवाय,तीन पाकिस्तानी लढाऊ जेटही पाडली गेली आहेत. तसेच भारतानं कराची बंदरावर दहापेक्षा जास्त स्फोट घडवले आहेत. पाकची डिफेन्स यंत्रणा निकामी केली आहे. पाकची 30 क्षेपणास्त्रही पाडली आहेत. संपूर्ण पाकिस्तानात ब्लॅकआऊट जारी करण्यात आला असून शाळा कॉलेजही पुढील तीन दिवस बंद ठेवण्यात आले आहेत.

India-Pakistan
India Attack On Pakistan: सर्वात मोठी बातमी! लवकरच युध्दाची घोषणा..? पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर PM मोदींची 'NSA'सोबत तातडीची बैठक

भारतानं पाकिस्तानात विरोधात केलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची तातडीची बैठक सुरू आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची बीएसएफच्या महासंचालकांसोबत चर्चा सुरू आहे.

पाकिस्तानकडून जम्मू विमानतळ,राजस्थान,पंजाबसह अनेक ठिकाणी अचानक ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर तातडीनं भारताचं एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय झालं.भारताचं S-400 या यंत्रणेनं पाकिस्तानचे सर्व ड्रोन हाणून पाडले.या दरम्यान जम्मूत सायरनचा आवाज करुन नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात आलं.

India-Pakistan
Indian Vs Pakistan War: भेदरलेल्या पाकिस्तानचे जम्मूसह राजस्थान,पंजाबमध्ये हल्ले; भारतीय लष्कराची धडाकेबाज कामगिरी; 8 ड्रोनसह पाकचं एफ-16 मिसाईलही पाडलं

भारतासाठी आता पुढील 24 ते 48 तास महत्त्वाचे राहणार आहे.तर ऑपरेशन सिंदूरनंतर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) गेल्या 40 तासांत मोठी पावलं उचलली आहेत. यामुळे पाकचे धाबे दणाणले आहे. देशातील आता राजस्थान,जम्मू-काश्मीर,पंजाबमध्ये पूर्णपणे 'ब्लॅकआउट'करण्यात आलं आहे. त्यानंतर या प्रदेशाचा ताबा लष्करानं (Indian Army) घेतला. दरम्यान,भारताची डिफेन्स सिस्टिम एस 400 सक्रिय झाली आणि त्या माध्यमातून भारताने पाकिस्तानचे अनेक ड्रोनला हवेतच लक्ष्य केल्याचं पाहायला मिळत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com