India Attack On Pakistan: सर्वात मोठी बातमी! लवकरच युध्दाची घोषणा..? पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर PM मोदींची 'NSA'सोबत तातडीची बैठक

India Vs Pakistan War : भारताने पाकिस्तानातील लाहोर,सियालकोट,कराचीसह चार शहरांवर हल्ला केला आहे. शिवाय,पाकिस्तानचे अवॉक्स विमान देखील पाडलं आहे.भारताने पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे.
Narendra modi and Ajit Doval.jpg
Narendra modi and Ajit Doval.jpgSarkarnama
Published on
Updated on

New Delhi:'ऑपरेशन सिंदूर'नंतरदेखील पाकिस्ताननं भारताला डिवचलं आहे.बिथरलेल्या पाकिस्ताननं जम्मू,पंजाब आणि राजस्थानमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला आहे.पण पाकिस्तानचे ड्रोन हल्ल्याचे सर्व प्रयत्न भारतानं हाणून पाडले आहेत.भारत-पाकिस्तान सीमेवर प्रचंड तणाव निर्माण झाला असून पाकिस्तानच्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) 'एनएसए'सोबत तातडीची बैठक बोलावली आहे. सध्या सुरु असलेल्या या बैठकीत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची गुरुवारी (ता.8)'एनएसए'सोबत (NSA) तातडीची बैठक सुरु आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार समितीचे अजित डोवाल यांच्यासोबत ही बैठक सुरु आहे. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. पुढील काही तासांतच भारताकडून युध्दाची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाकिस्तानकडून जम्मू विमानतळ,राजस्थान,पंजाबसह अनेक ठिकाणी अचानक ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला.यानंतर तातडीनं भारताचं एअर डिफेन्स सिस्टीम सक्रिय झालं.भारताचं S-400 या यंत्रणेनं पाकिस्तानचे सर्व ड्रोन हाणून पाडले.या दरम्यान जम्मूत सायरनचा आवाज करुन नागरिकांना घरात राहण्याचं आवाहन करण्यात आलं.

Narendra modi and Ajit Doval.jpg
Indian Vs Pakistan War: भेदरलेल्या पाकिस्तानचे जम्मूसह राजस्थान,पंजाबमध्ये हल्ले; भारतीय लष्कराची धडाकेबाज कामगिरी; 8 ड्रोनसह पाकचं एफ-16 मिसाईलही पाडलं

पाकिस्तानने ड्रोन हल्ल्याच्या माध्यमातून जम्मूतील विमानतळ,जम्मू रेल्वे स्टेशन, चन्नी हिम्मत,आर.एस.पुरा या भागात पाकिस्तानकडून हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण भारताने हे सर्व ड्रोन हल्ल्याचा डाव उधळून लावला. पाकिस्तानकडून पठाणकोट एअरबेसवरही हल्ल्याचा प्रयत्न झाला. पण तो हल्लाही भारताने परतवून लावला आहे.

पाकिस्तानचे ड्रोन राजस्थानच्या जैसलमेरमध्येही घिरट्या घालत होते.ते ड्रोनदेखील भारताने पाडले. पाकिस्तानचे ड्रोन अकाशात घिरट्या घालत असल्याचं समोर आल्यानंतर जैसलमेर,पंजाबच्या अमृतसह आणि होशियारपूर येथे देखील ब्लॅकआऊट करण्यात आले.

Narendra modi and Ajit Doval.jpg
Lalu Prasad Yadav : विधानसभा निवडणुकीआधीच बिहारच्या राजकारणात ट्विस्ट; लालू प्रसाद यादवांच्या अडचणी वाढणार, राष्ट्रपतींचा मोठा निर्णय

भारताने पाकिस्तानातील लाहोर,सियालकोट,कराचीसह चार शहरांवर हल्ला केला आहे. शिवाय,पाकिस्तानचे अवॉक्स विमान देखील पाडलं आहे.भारताने पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे. शिवाय, तीन पाकिस्तानी लढाऊ जेटही पाडली गेली आहेत. याशिवाय, परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्याशी चर्चा सुरू झाली आहे.

पाकिस्तानकडून हल्ले सुरू झाल्यानंतर भारतानेही जोरदार प्रत्युत्तर देणं सुरू केलं आहे. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची तातडीची बैठक सुरू आहे. भारताने पाकिस्तानच्या लाहोरवर ड्रोन हल्ला केला आहे. शिवाय, तीन पाकिस्तानी लढाऊ जेटही पाडली गेली आहेत. पाकिस्तानकडून हल्ले सुरू झाल्यानंतर भारताकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात आहे. दरम्यान संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे स्वत: पूंछमध्ये दाखल असून, सीडीएस आणि तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांची तातडीची बैठक बोलावली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com