Pahalgam Terror Attack : 'वॉटर स्ट्राईक'नंतर डिजिटल स्ट्राईक! भारताचा पाकिस्तानला दुसरा मोठा झटका!

India Blocks Pakistan’s X account : पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे. अशातच केंद्र सरकारने देखील दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे.
India blocks Pakistan’s X account
India blocks Pakistan’s X accountSarkarnama
Published on
Updated on

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे मंगळवारी (ता.22) पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. हल्लेखोरांना कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे.

अशातच केंद्र सरकारने देखील दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्या पाकिस्तानविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. त्यानुसार बुधवारी झालेल्या सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीत भारताने पाकिस्तानशी असलेला सिंधू पाणी करार स्थगित केला.

त्याशिवाय पाकिस्तानी लोकांना 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. अशातच आता 'वॉटर स्ट्राईक' नंतर भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. पाकिस्तान सरकारचे एक्स अकाउंट ब्लॉक करत भारताने ही मोठी कारवाई केली आहे.

India blocks Pakistan’s X account
Pahalgam Terror Attack : PM मोदींनी सिंधूचं पाणी अडवताच सुरक्षा दलानेही दहशतवाद्यांचा फास आवळला! 1500 हून अधिक जण ताब्यात

नेमकं प्रकरण काय?

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने 'एक्स' या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मला भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत एक्स अकाउंट ब्लॉक करण्याची विनंती केली होती. त्यानंतर एक्सने पाकिस्तान सरकारचे अकाउंट ब्लॉक केलं आहे.

त्यामुळे आता हे अकाउंट भारतातीय युजर्ससाठी उपलब्ध नाहीये. त्यामुळे सिंधू करार स्थगीत करत वॉटर स्ट्राईक तर एक्स अकाउंट ब्लॉक करत भारत सरकारने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केल्याचं पाहायला मिळत आहे.

पाकिस्तान विरोधात मोठे निर्णय

दरम्यान, सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीच्या बैठकीनंतर भारतीने पाकिस्तान विरोधात अनेक मोठे निर्णय घेतले. ज्यामध्ये 1960 चा सिंधू पाणी करार तात्काळ स्थगित करण्यात आला आहे. शिवाय जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला पाठीशी घालत राहील तोपर्यंत हा करार स्थगित राहील अशी भूमिका भारताने घेतली आहे.

India blocks Pakistan’s X account
India Pakistan water conflict : PM मोदींचा वॉटर स्ट्राईक; सिंधू जल कराराला स्थगिती; पाकिस्तानवर होणार भयंकर परिणाम

यासह संयुक्त चेकपोस्ट अटारी बंद करण्यात आला आहे. शिवाय ज्यांनी वैध मार्गाने अटारी सीमा ओलांडली आहे ते 1 मे पर्यंत पूर्वी त्याच मार्गाने परत जाऊ शकतात. तर पाकिस्तानी नागरिकांना सार्क व्हिसा अंतर्गत भारतात प्रवास करण्याची परवानगी रद्द करण्यात आली आहे. तसंच सर्व पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com