Shashi Tharoor : शशी थरूर यांनीच राहुल गांधींना पाडलं तोंडावर’; सरकारच्या निर्णयाला उघड पाठिंबा

Rahul Gandhi IAS UPSC NDA Government : केंद्र सरकारमधील काही वरिष्ठ पदांची भरती परीक्षेविना करण्यासाठी यूपीएससीने नुकतीच जाहिरात प्रसिध्द केली आहे.
Rahul Gandhi, Shashi Tharoor
Rahul Gandhi, Shashi TharoorSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : केंद्र सरकारमध्ये सहसचिव, उपसचिव आणि संचालक अशा 45 पदांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून परीक्षेविना केली जाणार आहे. त्यावरून काँग्रेसचे नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एनडीए सरकारवल हल्ला चढवला होता. पण त्यांच्याच पक्षाचे खासदार शशी थरूर यांनी सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

यूपीएससी नुकतीच भरतीची जाहिरात प्रसिध्द केली आहे. त्यावरून विरोधक आणि सरकार आमनेसामने उभे ठाकले आहे. यूपीए सरकारच्या काळातच अशी पदभरती सुरू झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. तर केंद्रीय मंत्री असलेल्या चिराग पासवान यांनी मात्र या भरतीला विरोध करत राहुल गांधींच्या भूमिकेचे एकप्रकारे समर्थन केले आहे.

Rahul Gandhi, Shashi Tharoor
Assembly Election 2024 : उमर अब्दुल्लांपाठोपाठ मेहबूबा मुफ्तीही शपथेला जागणार; मुलीला उतरवलं रिंगणात

एनडीएतील मित्रपक्ष विरोध करत असताना शशी थरूर यांनी राहुल गांधींनाच तोंडावर पाडलं आहे. शरूर यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे की, लॅटरल एन्ट्री (परीक्षेविना भरती) सरकारसाठी विशिष्ट क्षेत्रातील तज्ज्ञ मिळवण्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे या क्षेत्रात कामांसाठी मदत होते. या कामांसाठी आपल्याकडे तज्ज्ञ नसतात. काही काळासाठी अशी पावले आवश्यक आहेत, अशी भूमिका थरूर यांनी मांडली आहे. मात्र, लांब पल्ल्याचा विचार केल्यास नियमांनुसार भरतीसाठी सरकारी अधिकाऱ्यांनाच सरकारने प्रशिक्षित करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

लॅटरल भरती पध्दत काय आहे?

आएएएस रँकच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्या जाणाऱ्या पदांवर यूपीएससीकडून लॅटरल भरती पध्दतीमध्ये थेट परीक्षेविना भरती केली जाते. विविध मंत्रालये, विभाग आणि केंद्राच्या संस्थांमध्ये थेट उपसचिव, संचालक, सहसचिव आदी पदांवर तज्ज्ञांची नियुक्ती होते. विविध खासगी क्षेत्रातील तज्ज्ञांना या माध्यमातून सरकारी कामकाजात आणले जाते. परीक्षेविना केवळ मुलाखतीच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया होते. त्यासाठी स्वतंत्रपणे अर्ज मागवले जातात.

Rahul Gandhi, Shashi Tharoor
Siddaramaiah : सिध्दरामय्या यांना पुढील दहा दिवसांत फिरवावी लागणार चक्रं

काय म्हटले होते राहुल गांधींनी?

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीका केली होती. नरेंद्र मोदी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून लोकसेवकांची भरती करून संविधानावर हल्ला चढवत आहेत. ‘IAS चे खासगीकरण’ हे आरक्षण संपविण्याची मोदींची गॅरंटी आहे, असा हल्ला राहुल गांधींनी चढवला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com