Lok Sabha Election 2024 : ‘विकसित भारत’चे मेसेज तुम्हालाही आले का? आयोगाची मोदी सरकारला तंबी

Election Commission of India : आचारसंहिता लागू झाल्यानंतर देशभरातील अनेकांना व्हॉट्सअॅपवर विकसित भारतचे संदेश आले होते. त्याबाबत आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती.
Election Commission
Election CommissionSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) कार्यक्रम जाहीर केल्यानंतर लगेचच आचारसंहिताही लागू झाली. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारसह राजकीय पक्ष, नेत्यांवर अनेक बंधने आली आहेत. त्याचे उल्लंघन केल्यास आयोगाकडून कारवाई केली जाते. याबाबतच्या तक्रारींची संख्या आता वाढू लागली असून, आयोगाकडूनही त्याची दखल घेत कारवाई सुरूही केली आहे.

मोदी सरकारने (Modi Government) निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशभरात विकसित भारत (Viksit Bharat) यात्रा काढली होती. तसेच नागरिकांना विकसित भारतचे संदेशही पाठवले जात होते. त्यामध्ये प्रामुख्याने सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि त्यावर प्रतिक्रिया मागवल्या जात होत्या. असे व्हॉट्सअॅप संदेश आचारसंहिता लागू झाल्यानंतरही अनेकांना आले.

Election Commission
Congress News : काँग्रेसच्या तिजोरीत खडखडाट; खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधींनी मांडली कैफियत

काँग्रेसकडून या मेसेजमुळे आचारसंहितेचा भंग झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे (Election Commission) करण्यात आली होती. त्याची दखल आयोगाने घेतली असून, केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाला असे मेसेज तातडीने थांबवण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचा अहवाल आयोगाला सादर करण्याच्या सूचनाही मंत्रालयाला देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही केंद्र सरकारला एक प्रकारची तंबीच आयोगाने दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आचारसंहिता लागू झाल्यानंतरही सरकारकडून मेसेज पाठवले जात असल्याच्या अनेक तक्रारी आयोगाकडे आल्या होत्या. त्यावर आयोगाने मंत्रालयाकडे खुलासा मागवला होता. त्यावर मंत्रालयाने आचारसंहिता (MCC) लागू होण्यापूर्वीच मेसेज पाठवले होते. काही तांत्रिक कारणांमुळे हे मेसेज मिळण्यास विलंब झाला असावा, असे उत्तर मंत्रालयाने दिले आहे.

पंतप्रधान मोदी, राहुल गांधींचीही तक्रार

आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार भाजपने (BJP) काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याविरोधात तर काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविरोधात आयोगाकडे केली आहे. मुंबईतील सभेत राहुल गांधींच्या भाषणातील ‘शक्ती’ मुद्द्यावरून भाजपने तक्रार केली आहे, तर पंतप्रधान मोदी आपल्या भाषणांमध्ये धार्मिक मुद्दे उपस्थित करत असल्याचे काँग्रेसने (Congress) तक्रारीत म्हटले आहे.

R

Election Commission
Lok Sabha Election 2024 : पल्लवी पटेलांनी वाढवली अखिलेश यांची डोकेदुखी; तीन उमेदवार जाहीर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com