Lok Sabha Election 2024 : प्रचाराचा धडाका सुरू असतानाच अखिलेश यांना धक्का; दोन पक्षांनी सोडली साथ

Akhilesh Yadav News : अखिलेश यादव यांचे मित्रपक्ष महान दल आणि जनवादी पक्षाने समाजवादी पक्षापासून फारकत घेतली आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात सपासाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
Akhilesh Yadav
Akhilesh YadavSarkarnama

Uttar Pradesh News : लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार शिगेला पोहचलेला असताना उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी आणि समाजवादी पक्षाला धक्का बसला आहे. सपाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांचे जुने सहकारी आणि महान दलाचे अध्यक्ष केशव देव मौर्य यांनी मंगळवारी पाठिंबा काढला होता. त्यानंतर जनवादी पक्षाचे संस्थापक संजय चौहान हेही आघाडीतून बाहेर पडले आहेत. दोन दिवसांत दोन पक्षांनी साथ सोडल्याने अखिलेश यांच्यासाठी मोठा झटका मानला जात आहे.

लोकसभा निवडणुकीत अखिलेश (Akhilesh Yadav) यांची अनेक पक्षांनी साथ सोडली आहे. सुरूवातीला जयंत चौधरी यांच्या पक्षासह अपना दलाने यापुर्वीच मैत्री तोडली आहे. आता निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाल्यानंतर महान दल आणि जनवादी पक्षानेही धक्का दिला आहे. (Latest Political News)

Akhilesh Yadav
PM Narendra Modi : मी हिंदू-मुस्लिम करायला लागलो तर..! पंतप्रधान मोदींनी फेटाळले आरोप

मैत्री तोडताना केशव देव मौर्य म्हणाले, लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीमध्ये (India Alliance) समावेश करण्यात आला नव्हता. पण समाजवादी पक्षाचे (Samajwadi Party) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी आमचा पाठिंबा मागितला होता. त्यापुर्वी आमची कोणत्याही पक्षासोबत आघाडी नव्हती, तसेच उमेदवारही नव्हते. त्यामुळे आम्ही सपाला पाठिंबा दिला होता. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सपासोबत जन अधिकार पक्षाचे अध्यक्ष बाबू सिंह कुशवाह येणार नाहीत, असे नेत्यांनी आधीच स्पष्ट केले होते. त्यानंतर आम्ही पाठिंबा जाहीर केला होता. पण दुसऱ्या टप्प्याची निवडणूक झाल्यानंतर कुशवाह यांचा पक्ष सपामध्ये विलीन झाला आणि त्यांना जौनपूर मतदारसंघातून उमेदवारीही देण्यात आली. महान दलाची सातत्याने उपेक्षा होत असल्याने पाठिंबा काढून घेत असल्याचे मौर्य यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, उत्तर प्रदेशात इंडिया आघाडी (India Alliance) विरुध्द एनडीए (NDA) असा थेट सामना होत आहे. भाजप सर्वाधिक जागा लढत असून त्याखालोखाल समाजवादी पक्षाने उमेदवार उतरवले आहेत. राज्यात 80 जागा असून सर्वच जागांवर विजय मिळवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे अमेठी आणि रायबरेली या दोन हायप्रोफाईल जागांचाही समावेश आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसला केवळ रायबरेलीमध्येच विजय मिळाला होता.   

Akhilesh Yadav
Swati Maliwal News : हे मोठं षडयंत्र..! खासदार स्वाती मालीवाल यांच्या पूर्वाश्रमीच्या पतीचे गंभीर आरोप

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com