Lok Sabha Election 2024 : रायबरेलीतून उमेदवारी का? राहुल गांधींनी प्रचार सभेतच सांगितलं कारण...

Rahul Gandhi News : मागील निवडणुकीत राहुल गांधी यांचा अमेठी मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर यावेळी त्यांनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ निवडल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Uttar Pradesh News : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी रायबरेली लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha Election 2024) प्रचाराला जोरदार सुरूवात केली आहे. केरळातील वायनाड मतदारसंघातील मतदान दुसऱ्या टप्प्यातच पार पडले आहे. त्यानंतर आता त्यांनी रायबरेलीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, अमेठी मतदारसंघ सोडून रायबरेलीत आल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत. राहुल यांनी हा मतदारसंघच का निवडला, याबाबत चर्चांना उधाण आले आहे. याचे उत्तर राहुल यांनीच सोमवारी रायबरेलीतील प्रचार सभेत दिले.

रायबरेलीमध्ये (Raebareli) प्रचार सभेत बोलताना राहुल यांनी आई सोनिया गांधींसोबत (Sonia Gandhi) झालेल्या चर्चेची माहिती दिली. ते म्हणाले, काही दिवसांपुर्वी मी आईसोबत बसलो होतो. मी आईला म्हटले की, मला दोन आई आहेत, असे एक-दोन वर्षांपूर्वी मी एका व्हिडिओमध्ये म्हटले होते. एक सोनिया गांधी आणि दुसरी इंदिरा गांधी. दोघांचीही ही कर्मभूमी आहे. त्यामुळे मी रायबरेलीतून निवडणूक लढण्यासाठी आलो आहे, असे राहुल (Rahul Gandhi) यांनी सांगितले. (Latest Political News)

Rahul Gandhi
Swati Maliwal : मोठी बातमी : केजरीवालांच्या PA कडून खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाण; पोलिस CM हाउसमध्ये...

रायबरेलीसोबत आमचे नाते अनेक वर्षांपासूनचे आहे. आमचे पणजोबा जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरूवात इथूनच केली होती, असेही राहुल म्हणाले. दरम्यान, सभेमध्ये राहुल यांनी भाजपवरही सडकून टीका केली. (Latest Marathi News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल यांनी आरोप केले की, भाजप (BJP) आणि आरएसएसचे लोक आपले संविधान बदलण्याची तयारी करत आहेत. त्यासाठी त्यांना 400 हून अधिक जागा हव्या आहेत. काँग्रेस (Congress) सत्तेत आल्यानंतर कोट्यवधी लोकांना लखपती बनवणार आहे. एक जुलैला जादू होईल. 8 हजार 500 रुपये महिलांच्या खात्यात खटाखट जातील, असेही राहुल म्हणाले.

देशात सोमवारी चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी राहुल यांनी मतदान करण्याचे आवाहन केले. केंद्रामध्ये चार जूनला इंडिया आघाडीचे सरकार सत्तेत येणार असल्याचा दावा राहुल यांनी केला. आज चौथ्या टप्प्यातील मतदान आहे. पहिल्या तीन टप्प्यांतच निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता येणार आहे, असा विश्वास राहुल यांनी व्यक्त केला.  

Rahul Gandhi
Lok Sabha Election Voting Update : मतदानाच्या रांगेतच आमदाराकडून मतदाराला जबर मारहाण; रांगेवरून झाला वाद...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com