Lok Sabha Session : राहुल गांधींनी 6 जणांची नावं घेत भाजपला चक्रव्युहात अडकवलं!

Lok Sabha Session Union Budget 2024 : राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत बोलताना अदानी-अंबानीवरून केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : अर्थसंकल्पावर बोलताना विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप आणि सरकारला धारेवर धरले. भाजपने चक्रव्यूह तयार केला असून त्यात देशातील जनतेला अडकवले असल्याची टीका त्यांनी केली. हा चक्रव्यूह सहाजण नियंत्रित करत असल्याचे ते म्हणाले.

लोकसभेत बोलताना राहुल यांनी अभिमन्यूला चक्रव्यूहात ज्याप्रमाणे अडकवले होते तसेच भारतातील लोकांनाही अडकवले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, 21 व्या शतकात नवीन चक्रव्यूह तयार झाला आहे, तो आहे पद्मव्यूह. तो चक्रव्यूह कमळच्या आकाराचा असून त्याचे चिन्ह पंतप्रधान नरेंद्र मोदी छातीवर लावून फिरतात. अभिमन्यूप्रमाणे भारतातील लोकांना अडकवले आहे.

Rahul Gandhi
Rahul Gandhi : राहुल गांधींनी आधी 'तो' फोटो दाखवला अन् हलव्यावरून भाषण ठोकलं; सीतारामण यांनी डोक्यालाच हात लावला...   

आजही चक्रव्यूहमध्ये सहा लोक आहेत. नरेंद्र मोदी, अमित शाह, मोहन भागवत, अजित डोवाल, अदानी आणि अंबानी नियंत्रित करत आहेत, असे राहुल म्हणाले. राहुल यांच्या या विधानावर सत्ताधारी सदस्यांनी आक्षेप घेतला. तसेच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही सभागृहाबाहेरील सदस्यांची नावे घेतल्याबद्दल त्यावर नाराजी व्यक्त केली.

चक्रव्यूहच्या मागे तीन शक्ती असल्याचे सांगत राहुल म्हणाले, आर्थिक ताकद, तपास यंत्रणा आणि राजकीय ताकद चक्रव्यूहची खरी ताकद आहे. अर्थसंकल्पाने या चक्रव्युहाची ताकद कमी होईल, अशी मला अपेक्षा होती. गरीब लोकांना मदत केली जाईल, असे वाटत होते. कामगार, लहान व्यवसायिकांना मदत होईल, असे वाटत होते. पण मोठे उद्योग, मोनोपॉली, राजकीय मोनोपॉलीसाठी फायदेशीर असलेले बजेट आहे, अशी टीका राहुल यांनी केली.

Rahul Gandhi
Bihar Reservation : नितीश कुमारांना सुप्रीम कोर्टाचा झटका; आरक्षणाची याचिका फेटाळली...

कोट्यवधी लोकांना रोजगार देणाऱ्या लहान उद्योगांना चक्रव्यूहमध्ये अडकवण्यात आले. जीएसटी, नोटबंदी आणि कर आतंकवादाचा शिकार लोक झाले. त्याला रोखण्यासाठी बजेटमध्ये काहीच नाही. सरकारच्या इंटर्नशिप योजनेचा ९९ टक्के युवकांना फायदा होणार नाही. त्यांचा पाय तोडून त्यावर बँडेज लावण्याचे काम करण्यात आल्याचे राहुल म्हणाले. बेरोजगारी आणि पेपरफुटीवरही राहुल यांनी टीका केली.

बजेटमध्ये अग्निवीरांच्या पेन्शनसाठी एक रुपयाही तरतूद करण्यात आलेली नाही. युवकांना अग्निवीरच्या चक्रव्यूहमध्ये फसवले. शेतकरी तुम्ही बनवलेल्या चक्रव्यूहमधून बाहेर पडण्यासाठी किमान हमीभाव मागत आहेत. तुम्ही त्यांच्याशी बोलत नाही, असा निशाणा राहुल यांनी साधला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com