Nirmala Sitharaman : कागद दाखवा, पैसे घेऊन जा! ‘सहारा’तील पैसे देण्याबाबत अर्थमंत्र्यांनी लोकसभेत केला खुलासा...

Sahara Investors Lok Sabha Supreme Court : सहारा उद्योगसमुहातील विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना पैसे परत देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटले आहे.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi : सहारा कंपनीतील गुंतवणूकदारांसाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोठी बातमी दिली आहे. गुंतवणूकदारांपैकी जे आवश्यक कागद घेऊन येतील, त्यांना पैसे दिले जातील, असे त्यांनी म्हटले आहे. लोकांनी येऊन दावा करावा, यासाठी तीनवेळा सार्वजनिक आवाहन करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

लोकसभेत सोमवारी सहारा कंपनीतील गुंतवणूकदारांच्या पैशांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. यावर उत्तर देताना सीतारमण म्हणाल्या, सहाराशी संबंधित संपूर्ण प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली आहे. सहारा इंडिया रिअल इस्टेट कॉर्पोरेशन लिमिटेड, सहारा हाऊसिंग आणि सहारा इंडिया कॉर्पोरेशनमधील गुंतवणूकदारांची संख्या 3.7 कोटी आहे.

Nirmala Sitharaman
Samajwadi Party : अखिलेश यांच्या लोकसभेतील विजयाला ग्रहण; अयोध्येतील ‘ते’ प्रकरण आलं अंगलट...

अर्थमंत्र्यांनी सांगितले की, सहकार मंत्रालयाकडे आतापर्यंत 1.21 कोटी दावे आले असून त्याची रक्कम 86 हजार 673 कोटी आहे. पण आतापर्यंत 374 कोटी रुपये 4.46 लाख गुंतवणूकदारांना देण्यात आले आहेत. त्यामध्ये 1.27 लाख गुंतवणूकदार असे आहेत, ज्यांचा दावा दहा हजार रुपयांपर्यंतच होता. सेबीने सुमारे 138 कोटी रुपयांचे दावे निकाली काढले आहेत. सहारा इंडिया कंपनीच्या 18 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. कंपनीशीही संबंधित प्रकरणांची चौकशी सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गुंतवणूकदारांनी ऑनलाईन क्लेम करावा. तीन न्यायाधीशांची कमिटी ते पाहील आणि क्लेमनुसार पैसे दिले जातील. सुप्रीम कोर्टाच्या तीन निवृत्त न्यायाधीशांच्या नियंत्रणाखाली ही प्रक्रिया सुरू आहे, असे सीतारमण म्हणाल्या. राजस्थानमधील खासदार अमरा राम यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

सहारा आणि पीएचसीएलमध्ये किती गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्यात आले, 15 हजार कोटी जमा होऊनही केवळ 138 कोटी परत करण्यात आल्याचे अमरा राम यांनी सांगितले. त्यावर केंद्रीय राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 17 हजार लोकांचे अर्ज आल्याची माहिती दिली.

Nirmala Sitharaman
Supreme Court : नायब राज्यपालांना 10 नगरसेवक नियुक्तीचे अधिकार; केजरीवाल सरकारला 'सुप्रीम' झटका

भाजपचे खासदार गणेश सिंह यांनी अनेक गुंतवणूकदारांकडे आवश्यक कागदपत्रे नाहीत. कागद असल्याशिवाय पोर्टलवर मान्य होत नाही. एजंट्सच्या माध्यमातून ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे, त्यांच्याबाबत सरकार काही वेगळी यंत्रणा करणार आहे का, असा सवाल गणेश सिंह यांनी केला होता. त्यावर अर्थमंत्र्यांनी याबाबत कोर्टाची कमिटी निर्णय घेईल, असे म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com