Delhi News : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात (Monsoon Session) मणिपूरच्या (Manipur) मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार घमासान सुरू आहे. हिंसाचार आणि महिला अत्याचाराबाबतचा मु्द्दा संसदेत गाजत आहे. या मुद्द्यावरून सर्व विरोधी पक्षांमध्ये अभूतपुर्व एकी दिसून आली. (Latest Marathi News)
केंद्र सरकारकडून या मुद्द्यावर चर्चा करण्यावर तयारी दाखवण्यात येत नव्हती. विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्याची मागणी केली होती. आता लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी अखेर या मागणीला परवानगी दिली आहे. (NO Confidence Motion Against Modi Government)
मणिपूर हिंसाचारामुळे देशभरात संतापाची लाट आहे. अविश्वास ठरावाच्या निमित्ताने तरी पंतप्रधान मोदी यावर निवदेन देतील अशी विरोधी पक्षांना आशा होती. अविश्वास प्रस्तावासंदर्भात काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीच्या वतीने अध्यक्षांना पत्र देण्यात आले होते. कोणताही सदस्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणू शकतो. मात्र यासाठी ५० खासदारांच्या समर्थनाची आवश्यकता असते. या अविश्वास प्रस्तावाची तयारी काँग्रेसने केली होती. सरकार विरोधातला हा दुसरा अविश्वास प्रस्ताव आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.