PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींकडून 'आरपार'च्या लढाईची घोषणा; म्हणाले, आता गाडण्याची वेळ...

What Happened in the Pahalgam Terrorist Attack? : पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देश व्यथित आहे. हल्ल्यातील पीडितांसोबत संपूर्ण देश उभा आहे, अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी व्यक्त केली.
PM Narendra Modi
PM Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी गुरूवारी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झाले. बिहारमधील मधुबनी येथे विविध विकासकामांचे लोकार्पण त्यांच्या उपस्थित झाले. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी दहशतवाद्यांना कठोर इशारा देताना त्यांच्या कल्पनेपलीकडे शिक्षा करण्याची वेळ आता आली असल्याचे मोठे विधान केले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी भाषणाच्या सुरूवातीलात उपस्थितांना जागेवरच बसून काहीवेळ शांत राहण्याचे आवाहन केले. त्यानंतर त्यांनीही हात जोडून आणि डोळे मिटत हल्ल्यातील मृतांना श्रध्दांजली अर्पण केली. भाषणाच्या शेवटच्या काही मिनिटांमध्ये त्यांनी या हल्ल्यावर बोलताना दहशतवाद्यांना इशारा दिला.

PM Narendra Modi
Pahalgam Terror Attack : 'वॉटर स्ट्राईक'नंतर डिजिटल स्ट्राईक! भारताचा पाकिस्तानला दुसरा मोठा झटका!

पंतप्रधान म्हणाले, पहलगाम हल्ल्याने संपूर्ण देश व्यथित आहे. हल्ल्यातील पीडितांसोबत संपूर्ण देश उभा आहे. ज्यांच्यावर उपचार होत आहेत, ते लवकर बरे व्हावेत, यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा गमावला, कुणी भाऊ, कुणी आपला जीवनसाथी गमावला. त्यामध्ये कुणी कन्ऩड, कुणी मराठी, कुणी ओडिया, कुणी गुजराती तर कुणी बिहारी होते. कारगिलपासून कन्याकुमारीपर्यंत आपला आक्रोश एकसारखा आहे.

पहलगामधील हल्ला केवळ पर्यटकांवर झालेला नाही. तर भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे दु:स्साहस केले आहे. ज्यांनी हा हल्ला केला आहे, त्या दहशतवाद्यांना आणि षडयंत्र रचलेल्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळणार आहे. शिक्षा मिळणारच. आता दहशतवाद्यांची राहिलेली जमीनही मातीत गाडण्याची वेळ आली आहे, असा इशारा पंतप्रधान मोदींनी यावेळी दिला.

PM Narendra Modi
Kasuri Pahalgam Video : पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड कसुरीच्या उलट्या बोंबा; म्हणतोय, 'पाकिस्तान जबाबदार नाही'

140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणार आहे. बिहारमधून मी संपूर्ण जगाला सांगू इच्छितो की, भारत प्रत्येक दहशतवाद्याचा शोध घेऊन त्यांना शिक्षा देईल. भारताचे धैर्य कोणताही दहशतवाद रोखू शकणार नाही. देशातील प्रत्येकजण यावर ठाम आहे. मानवतेवर विश्वास असलेला प्रत्येकजण आमच्यासोबत असेल, असा विश्वास आहे. शांतता आणि सुरक्षितता ही गतीने विकासासाठी गरजेचे असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com