Kangana Ranaut
Kangana Ranaut Sarkarnama

कंगनाचा पाय खोलात; थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं प्रकरण!

कंगनाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तिच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.

नवी दिल्ली : भारताला (India) 1947 मध्ये मिळालेले स्वातंत्र्य (Independence) हे भीक म्हणून मिळाले होते, खरे स्वातंत्र्य तर 2014 मध्येच मिळाले, या वक्तव्यावरुन अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) वादात सापडली होती. यानंतर तिने शिखांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे ती अडचणीत आली होती. आता तिच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. तिच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेण्यात आली आहे.

सोशल मीडियावर कंगनाला प्रतिबंध घालावा, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली आहे. यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय, माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) आणि विविध राज्यांची पोलीस दले यांना यासाठी निर्देश द्यावेत, असेही याचिकेत म्हटले आहे. सरदार चरणजितसिंह चंदरपाल यांनी ही याचिका दाखल केली आहे. देशातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कंगनाच्या सोशल मीडिया पोस्टवर निर्बंध घालावेत, असेही त्यांनी याचिकेत म्हटले आहे.

कंगनाने शेतकऱ्यांना खलिस्तानी दहशतवादी म्हटल्याप्रकरणी विविध ठिकाणी दाखल झालेले एफआयआर मुंबईतील खार पोलीस ठाण्यात वर्ग करावेत. या प्रकरणी 6 महिन्यांत आरोपपत्र दाखल करावे आणि खटल्याची सुनावणी 2 वर्षांत पूर्ण करावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. कंगनाकडून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग सुरू आहे, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे.

Kangana Ranaut
भाजपचा मित्रपक्ष काँग्रसेच्या वळचणीला गेला अन् महुआ मोईत्रा भडकल्या

दरम्यान, ठार मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या आहेत, असा दावा कंगनाने नुकताच केला. याबाबत तिने हिमाचल प्रदेश पोलिसांकडे धाव घेतली आहे. या प्रकरणी हिमाचल पोलिसांनी तिच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल केला आहे. कंगनाने म्हटले आहे की, भटिंड्यातील एक व्यक्ती मला जाहीरपणे ठार मारण्याची धमकी देत आहे. मी अशा प्रकारच्या भ्याड धमक्यांना घाबरत नाही. देशाच्या विरोधात षडयंत्र करणारे आणि दहशतवादी यांच्या विरोधात मी बोलतच राहीन. मग ते जवानांची हत्या करणारे नक्षलवादी, टुकडे-टुकडे गँग अथवा खलिस्तानी असोत.

Kangana Ranaut
काँग्रेसने एकाच बाणात मारले दोन पक्षी : भाजप अन् तृणमूल काँग्रेस

शिखांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबईतही कंगनाविरोधात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे. मुंबईतील व्यावसायिक आणि दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने ही तक्रार दिली आहे. याचबरोबर शिरोमणी अकाली दलानेही कंगनाच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात वर्षभर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला खलिस्ताना ठरवून शेतकऱ्यांचा उल्लेख खलिस्तानी दहशतवादी असा कंगनाने केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com