Rahul Gandhi News : इंदिरा गांधींच्या काळात दलित, आदिवासी, ओबीसींना माहीत होते की काँग्रेस त्यांच्यासाठी काम करत आहे. मात्र 1990 च्या दशकात दलित, ओबीसींच्या हिताकडे काँग्रेसने दुर्लक्ष केले. त्यांना हिताची रक्षा ज्या प्रकारे करायला हवी होती ती त्या प्रकारे केली नाही. काँग्रेसच्या या चुकीमुळे आरएसएस सत्तेमध्ये आली, असे राहुल गांधी यांनी दलित इन्फ्लुअन्सरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात म्हटले
काँग्रेसच्या चुकांवर बोट ठेवत राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसची जनाधार काँग्रेससोबत आली तर भाजप आणि आरएसएसला जावं लागेल आणि असे लवकरच होईल.
माजी पंतप्रधान नरसिंहराव यांचे नाव न घेता राहुल गांधी म्हणाले की त्यांच्या कार्यकाळात दलित-मागासवर्गीय-अल्पसंख्याकांचा काँग्रेसवरील विश्वास कमी झाला असेल. मी नावे घेणार नाही, पण हे सत्य आहे आणि काँग्रेसला हे सत्य स्वीकारावेच लागेल.
भाजपला पराभूत करण्याची रणनीती सांगताना राहुल गांधी म्हणाले, ज्या दिवशी आपण एकत्र येऊ त्या दिवशी ते (भाजप आरएसएस) पळून जातील.आपल्याला हक्कांसाठी लढावे लागेल.आपल्याला एकतेवर काम करावे लागेल.
आपल्याला दलित, मागासलेले, अतिमागास, अल्पसंख्याकांचे ऐकावे लागेल आणि त्यांना पुढे घेऊन जावे लागेल. पण मला वाटते की हे करण्यासाठी काही वर्षे लागतील. तुम्ही हे पाहत आहात की भाजपवाले देश चालवू शकत नाहीत. ते फसवे आहेत , असे देखील राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी म्हणाले, जोपर्यंत दलित, आदिवासी यांना सत्तेत हिस्सा मिळत नाही तोपर्यंत समस्या सुटत नाही. ज्यांची जेवढी संख्या तेवढा त्यांचा भागीदारी. मागासवर्गीयांची संख्या 50 टक्के आहे. त्यांना केवळ पाच टक्के वाटा सत्तेत मिळतोय. तर दलितांची संख्या 15 टक्के आहे. पण सत्तेमध्ये त्यांचा वाटा केवळ 1 टक्का आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.