Rahul Gandhi On PM Modi: प्रश्न विचारुन खूप दिवस झाले..; अदानी प्रकरणावरुन राहुल गांधी पुन्हा आक्रमक, See Video

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यापासून काँग्रेस सत्ताधारी भाजपविरोधात अधिक आक्रमक झाली आहे.
Rahul Gandhi
Rahul GandhiSarkarnama

Rahul Gandhi Criticized PM Narendra Modi : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत गौतम अदानी प्रकरणी घेरण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधींनी रविवारी (2 एप्रिल) त्यांच्या सोशल मिडीयावर एक व्हिडीओ शेअर करत मोंदींना प्रश्न विचारले आहे. राहुल गांधींनी (Rahul Gandhi) फेसबुकच्या माध्यमातून ५९ सेकंदांचा व्हिडिओ शेअर करत ते वीस हजार कोटी कोणाचे आहेत, असा सवाल केला आहे. पण यामुळे राजकारण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना एका मानहानी प्रकरणात दोन वर्षांची शिक्षा दिली. यानंतर लोकसभेत राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. त्यानंतर, पण तेव्हापासून काँग्रेसने सत्ताधारी भाजपविरोधात अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राहुल गांधी यांनी संसदेत अदानी प्रकरणात प्रश्न विचारल्यामुळे आमचा आवाज दाबण्यासाठी राहुल गांधींवर ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे.

Rahul Gandhi
Vikhe Patil Angry to Dhirendra Shastri : बागेश्वरबाबांच्या विधानावर विखे पाटील संतापले : ‘तथाकथित महाराजांचा वाचाळपणा बंद झाला पाहिजे’

दरम्यान, राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा त्यांच्या फेसबुक पोस्टमधून भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.“पंतप्रधान जी, प्रश्न विचारून खूप दिवस झाले! मला तुमचा प्रतिसाद अजून मिळालेला नाही, म्हणून मी पुन् एकदा आठवण करुन देत आहे. ते 20 हजार कोटी रुपये कोणाचे आहेत? LIC, SBI, EPFO ​​मध्ये जमा केलेले पैसे अदानीला का दिले जातायेत? देशाला तुमच्या आणि अदानींच्या नात्याची सत्यता सांगा!''अशी पोस्ट केली आहे. या सोबतच त्यांनी १ मिनिटांचा व्हिडीओही शेअर केला आहे.

अदानी मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात काँग्रेस आणि राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर राहुल गांधी यांनी संसदेत सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. अदानी प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती स्थापन करण्याची मागणी काँग्रसकडून करण्यात आली आहे. संसदेतील गोंधळामागे काँग्रेसने केलीली हीच मागणी असल्याचे म्हटले जात आहे.

Rahul Gandhi
Radhakrishna Vikhe Patil : बाळासाहेब थोरात खिंड सोडुन पळुन गेले : राधाकृष्ण विखे पाटील

अदानी प्रकरणावर सरकारला प्रश्न विचारल्यामुळे सत्ताधारी पक्षाने राहुल गांधींना त्यांचे संसदेचे सदस्यत्व गमवावे लागले, असा आरोपही काँग्रेसकडून होत आहे. 25 मार्च रोजीही राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांचा एक व्हिडिओ शेअर करताना केंद्रावर निशाणा साधला होता. मी सत्य बोलतो, देशाच्या हितासाठी बोलतो आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी सत्याच्या मार्गावर चालेन, असे ट्विट त्यांनी केले होते. पंतप्रधान जी, सांगा 20 हजार कोटी कुणाचे आहेत. असं त्यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटलं होतं.

या व्हिडीओत राहुल गांधी म्हणाले होते की, "तुम्ही मला (संसदेतून) कायस्वरुपी अपात्र करा, तुरुंगात टाका,पण मी माझे काम सुरूच ठेवणार, मी थांबणार नाही." "जनतेला माहित आहे." ते अदानी जी एक भ्रष्ट व्यक्ती आहे, आता जनतेच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे की भारताचे पंतप्रधान या भ्रष्ट व्यक्तीला का वाचवत आहेत?'' असाही सवाल त्यांनी आपल्या व्हिडीओत विचारला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com