Rahul Gandhi supports caste census: काँग्रेसचा मोदींच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाला जाहीर पाठिंबा; पण राहुल गांधी म्हणाले...

Cabinet Decision On Caste Cenus : जातनिहाय जनगणना ही मूळची काँग्रेसची संकल्पना आहे. आम्ही अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी करत आलो आहोत. पण जातनिहाय जनगणनेनंतरच भारताचा खरा विकास सुरू होईल.
Rahul Gandhi Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Rahul Gandhi News : एकीकडे पहलगाम दहशतवाद हल्ल्यावरुन वातावरण तापलं असतानाच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसनं आपला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ही घोषणा केली आहे.

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारनं जातनिहाय जनगणनेची घोषणा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेसची जातनिहाय जनगणनेच्या (Caste Cenus) निर्णयावर भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. या सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा असणार आहे. पण याचवेळी त्यांनी सरकारनं घोषणा केलेली जातनिहाय जनगणना कधी होणार,असा सवालही उपस्थित केला आहे.

राहुल गांधी म्हणाले, जातनिहाय जनगणना ही मूळची काँग्रेसची संकल्पना आहे. आम्ही अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी करत आलो आहोत. जातनिहाय जनगणनेनंतरच भारताचा खरा विकास सुरू होईल.यासाठी आरक्षणासाठी असलेली 50 टक्क्यांची मर्यादा हटवली पाहिजे असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

Rahul Gandhi Narendra Modi
Dhananjay Munde On Caste Census : मोदींचा ऐतिहासिक निर्णय अन् धनंजय मुंडेंनी काढली गोपीनाथरावांची आठवण!

मात्र,जातनिहाय जनगणनेसाठी बजेटमध्ये तरतूद कधी करण्यात येणार अशी विचारणाही त्यांनी पत्रकार परिषदेत केली. तेलंगणा हे जातनिहाय जनगणनेसाठी आदर्श मॉडेल असणार आहे. त्याचमुळे केंद्राच्या निर्णयाला काँग्रेसचा पाठिंबा असणार असल्याचंही राहुल गांधींनी म्हटलं.

देशाच्या नव्या उभारणीसाठी जातनिहाय जनगणना हे पहिलं पाऊल असणार आहे. जातीय जनगणना करणारे बिहार हे पहिले राज्य असून तेलंगणा हे दुसरे राज्य आहे. पण तेलंगणात आमच्या सरकारनं खूप बारकाईनं जातनिहाय जनगणनेवर काम केल्याचाही आवर्जून उल्लेख काँग्रेसच्या राहुल गांधी यांनी यावेळी केला.

Rahul Gandhi Narendra Modi
Modi Government On Caste Cenus: मोदींनी विरोधकांना धक्का दिला, पण जातनिहाय जनगणनेचे 'हे' असणार फायदे अन् तोटे

जातनिहाय जनगणना करण्यासाठी आम्ही सरकारवर दबाव आणला होता. मूळ मागणी आमची होती. त्यावर आता सरकारनं निर्णय घेतला आहे. त्याचं आम्ही स्वागत करतो, पण जातनिहाय जनगणना कधीपर्यंत करणार हे सरकारनं आता स्पष्ट करावं, असंही मत राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केलं.

जातनिहाय जनगणनेनंतरच भारताचा खरा विकास सुरू होणार आहे. देशाच्या नव्या उभारणी दृष्टीनं जातनिहाय जनगणना हे टाकलेलं पहिलं पाऊल असणार आहे. पण याचवेळी राहुल गांधींनी भाजपनं आमची संकल्पना स्विकारली ही आनंदाची गोष्ट असल्याचा टोलाही लगावला. तसेच त्यांनी जातनिहाय जनगणनेसाठी एका चांगल्या ब्लू प्रिंटची आवश्यकता असल्याची भूमिकाही मांडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com