काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात ज्या मुलांचे आई-वडील मारले गेले आहेत, अशा २२ अनाथ मुलांना ते दत्तक घेणार आहेत. याची अधिकृत प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता या मुलांचं पालकत्व राहुल गांधी स्विकारणार आहेत.
राहुल गांधी यांनी मे महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्याला भेट दिली होती. या भेटीदरम्यान त्यांनी पक्षाच्या स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करत पीडित मुलांची यादी तयार करण्यास सांगितलं. यानंतर एक सर्वेक्षण केलं आणि सरकारी रेकॉर्डच्या तपासणीनंतर या मुलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. या दौऱ्यात राहुल गांधींनी गोळीबारात मारल्या गेलेल्या उरबा फातिमा आणि जैन अली या १२ वर्षीय जुळ्या मुलांच्या सहकारी विद्यार्थ्यांना ख्राईस्ट पब्लिक स्कूलमध्ये भेट दिली. पाकिस्तानच्या गोळीबारात सर्वाधिक फटका बसलेल्या भागांमध्ये पूछंचा देखील समावेश आहे. यामध्ये लहान मुलांसह अनेक नागरिक जखमी झाले होते.
ऑपरेशन सिंदूर ही मोहिम पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर चालवण्यात आलं होती. यामध्ये या वर्षी २२ एप्रिलला २६ लोकांना जीव गमवावा लागला होता. याच्या प्रत्युत्तरात भारतानं पाकच्या ताब्यातील काश्मीर आणि पाकिस्तानात नऊ दहशतवादी ठिकाणांना निशाणा बनवलं होतं. तसंच १०० हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ७ मेच्या मोहिमेनंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही देश १० मे रोजी युद्धबंदी करण्यास तयार झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.