Sanjay Raut News : तिघांमध्ये सुरु असलेला महायुतीचा संसार टिकत नसतो..

Mahayuti : संजय राऊत यांची टीका; अहंकारी लोकांविषयी काय बोलणार
Sanjay Raut
Sanjay Rautsarkarnama
Published on
Updated on

Sanjay Raut Political News : आगामी विधानसभा निवडणुकीत जर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असतील तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचे काय होणार हे त्या दोघांनी सांगावे. आता तिघांमध्ये सुरु असलेला महायुतीचा संसार टिकत नसल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर केली.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे Chandrashekhar Bawankule यांनी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री म्हणून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर शपथ घेतील, असे वक्तव्य केले. यावरुन ठाकरे गटाचे संजय राऊत Sanjay Raut यांनी पुन्हा महायुतीवर निशाणा साधला आहे. तर आशिष शेलार हे खालच्या पातळीचे आहेत, त्याच्यावर काय बोलणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

Sanjay Raut
पंकजा मुंडेंसाठी आमदार मतदारसंघ सोडायला तयार | MLA Ratnakar Gutte | Pankaja Munde |

देवेंद्र फडणवीस हेच 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्यांच्या शपथ विधीचा सोहळा मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होईल, असे बावनकुळे यांनी सुतोवाच केलं आहे. रविवार दि. 3 डिसेंबर रोजी भंडाऱ्यातील लाखनी येथे भाजपाने दिवाळी मिलन कार्यक्रम आयोजित केला होता.

यावेळी बावनकुळे याबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुतीवर सडकून टीका केली. राऊत म्हणाले, 2024 ला फडणवीस मुख्यमंत्री होतील असे जर बावनकुळे म्हणत असतील तर यावर उत्तर भाजपानेही दिले पाहिजे. एकनाथ शिंदे Eknath Shinde आणि अजित पवार या दोघांचे काय होणार हे त्या दोघांनी सांगावे.

लग्न दोघांमध्ये होतं, पण हे लग्न तिघांमध्ये झाले आहे. त्यामुळे संसार सध्या तिघांचा आहे. तिघांचा संसार टिकत नाही. आम्हीही युतीत होतो पण आमचे बरे चालले होते, आमच्यात असे वाद नव्हते. आशिष शेलार हे खालच्या पातळीचे असल्याने ते खालच्या पातळीचेच बोलणार. आमच्या पक्षाकडे सांगण्यासारखे आहे म्हणून मी सांगतो. तुम्ही ते प्रसार माध्यमांवर दाखवता. आम्ही कोणाला निमंत्रण देऊन बोलवून घेत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अहंकार असतो काहींना अशा लोकांविषयी काय बोलणार ? असा टोला राऊतांनी शेलार यांना लगावला. तर, पाच राज्यांचा जो निकाल लागला आहे त्याचा महाराष्ट्रावर काही परिणाम होणार नाही. काँग्रेसला या निवडणुकीत 40 टक्के मतदान झाले आहे. 40 टक्के मतदान होणे ही लहान गोष्ट नाही असेही राऊत यांनी सांगितले.

Edited By : Amol Sutar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com