Toll Plaza New Rule: महामार्गावरून प्रवास करण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा; 1 एप्रिलपासून टोल नाक्यांवर 'हा' नियम बदलणार...

Toll plaza new rule from 1 April in India : महामार्गावरून प्रवास करण्यापूर्वी ही महत्त्वाची बातमी वाचा. १ एप्रिलपासून टोल नाक्यांवर नवा नियम लागू होणार आहे. जाणून घ्या काय बदल होणार आणि त्याचा तुमच्या प्रवासावर काय परिणाम होईल.
NHAI new toll collection rules update
NHAI new toll collection rules updateSarkarnama
Published on
Updated on

New government rule for toll plazas in India: महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. तुम्ही नेहमी हायवे किंवा एक्सप्रेस वे चा वापर करत असाल, तर १ एप्रिल २०२६ पासून लागू होणारा हा बदल जाणून घेणे आवश्यक आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुली प्रक्रियेत मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १ एप्रिल २०२६ पासून सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर रोख रकमेने पेमेंट करण्याची सुविधा पूर्णपणे बंद केली जाणार आहे. म्हणजेच, वाहनचालकांना टोल भरण्यासाठी आता केवळ डिजिटल पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. यामध्ये फास्टॅग आणि यूपीआय या पद्धतींचाच स्वीकार केला जाईल.

NHAI new toll collection rules update
बापरे! मुंबईच्या महापौर 70 लाखांचं घड्याळ वापरतात? कोणती कंपनी? कोणते मॉडेल? वाचा सविस्तर

या निर्णयामागे मुख्य उद्दिष्ट म्हणजे टोल नाक्यांवरील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे. सध्या अनेक ठिकाणी रोख रकमेने टोल भरणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या रांगा लागतात. एका वाहनाचे पेमेंट पूर्ण होण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ इतर वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरतो. परिणामी, महामार्गांवर अनावश्यक विलंब आणि इंधनाचा अपव्यय होतो. डिजिटल पेमेंटमुळे ही प्रक्रिया काही सेकंदांत पूर्ण होईल आणि वाहनांची हालचाल अधिक सुरळीत होईल.

डिजिटल व्यवहारामुळे पारदर्शकताही वाढणार आहे. प्रत्येक व्यवहाराची नोंद डिजीटल पद्धतीने राहणार असल्याने हिशोब ठेवणे सोपे होईल. कोणते वाहन कोणत्या वेळी टोल नाक्यावरून गेले, याची अचूक माहिती उपलब्ध राहील. त्यामुळे गैरव्यवहारांना आळा बसण्यास मदत होईल.

NHAI new toll collection rules update
DA Hike Pensioners : सरकारी कर्मचाऱ्यांनंतर आता पेन्शनर्सना सरकारचं मोठं गिफ्ट! महागाई भत्ता 257 टक्क्यांवर, जाणून घ्या कधीपासून मिळणार लाभ

वेळेची बचत हा या निर्णयाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा आहे. फास्टॅग प्रणालीमुळे वाहन थांबवण्याची गरज भासत नाही. सेन्सरद्वारे टोलची रक्कम थेट खात्यातून वजा होते. यूपीआय पर्यायामुळेही रोख रकमेची गरज उरणार नाही. त्यामुळे प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

या पार्श्वभूमीवर, वाहनधारकांनी आपला फास्टॅग सक्रिय आहे का, त्यात पुरेशी शिल्लक आहे का आणि डिजिटल पेमेंटसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध आहेत का, याची खात्री करून घेणे गरजेचे आहे. १ एप्रिलपासून रोख रक्कम स्वीकारली जाणार नसल्याने आधीच तयारी करून ठेवणे हिताचे ठरेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com