
Union Budget 2025 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी त्यांनी शेतकर्यांसह विविध लाभ देण्यासह सूक्ष्म व लघू उद्योगातून देशात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करणार असल्याची घोषणा केली.
यावेळी बोलताना त्यांनी किसान क्रेडिट कार्डवरील कर्जाची मर्यादा 5 लाखांवर नेणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी (Nirmala Sitharaman) जाहीर केलं. त्यामुळे आता किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा 3 लाखांवरुन 5 लाखांवर नेल्याचं सांगितलं. तसंच यूरीया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात 3 कारखाने उभारणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.
या कारखान्यांची निर्मिती क्षमता बारा लाख मेट्रिक टन इतकी असणार आहे. तर यावेळी त्यांनी सूक्ष्म व लघू उद्योगातून देशातील सात कोटीहून अधिक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलं जाणार असल्याचं सांगितलं. सूक्ष्म व लघू उद्योगांना रोजगार निर्मितीसाठी मदत केली जाणार असल्याचं जाहीर केलं.
तर यावेळी त्यांनी कापूस उत्पादकांना दिलासा देणारी घोषणा केली. देशभरातली कापूस उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन देणार असल्याचं सांगत मत्स्य पालनाला देखील प्रोत्साहन देण्यावर भर देणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.