
New Delhi News : लोकसभेत वक्फ सुधारित विधेयक सादर होण्यापूर्वीच केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेससह इतर काही विरोधी पक्षांतील खासदारांकडून या विधेयकाला खासगीत बोलताना पाठिंबा असल्याचे रिजिजू म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानामुळे विरोधी पक्षांमध्ये विधेयकावरून दोन गट पडल्याची चर्चा आहे.
वक्फ सुधारित विधेयकाला काँग्रेससह इतर सर्वच विरोधी पक्षांकडून कडाडून विरोध केला जाणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत तशी रणनीती ठरवण्यात आली आहे. तर सरकारकडूनही विधेयकाच्या बाजूने लोकसभेत पूर्ण ताकद लावली जाणार आहे. मतदानाची वेळ आल्यास कुठेही दगाफटका होऊ नये, याची पुरेपूर काळजी सरकारने घेतली आहे.
रिजिजू यांचे विधानही त्याच रणनीतीचा एक भाग असल्याचे बोलले जात आहे. विधेयक सादर होण्यापूर्वी मीडियाशी बोलताना ते म्हणाले, राजकीय कारणांसाठी काही सदस्य विधेयकाला विरोध करत आहेत. काँग्रेसमधील अनेक नेते आणि विरोधी पक्षांकडून खासगीत या विधेयकाची गरज असल्याचे सांगितले जात आहे. पण व्होट बॅंकेसाठी ते विरोध करत आहेत.
गरीब मुस्लिमांसाठी असलेले हे विधेयक लोकांच्या कायमस्वरुपी लक्षात राहील. वक्फ बोर्डाकडून ज्या पध्दतीने गैरवापर होत आहे आणि गरिबांची संपत्ती लुटली जात आहे, ते संपण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. विरोधकांकडून विधेयकाबाबत गैरसमज पसरवले जात असल्याची टीकाही रिजिजू यांनी केली.
दरम्यान, विधेयकाच्या बाजूने एनडीएतील सर्व घटक पक्षांकडून मतदान केले जाणार आहे. आंध्र प्रदेशातील टीडीपी आणि बिहारमधील जेडीयू या प्रमुख पक्षांकडूनही याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांच्या काही सूचना मान्य करत सरकारने त्यांना खूष करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष विधेयकाच्या बाजूने उभे राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.