Uttar Pradesh Lok Sabha Election : …तर 'यूपी'तील दोन लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक! ही आहेत कारणं

Lok Sabha Election Result Akhilesh Yadav Rahul Gandhi : उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.
Rahul Gandhi, Akhilesh Yadav
Rahul Gandhi, Akhilesh YadavSarkarnama

Uttar Pardesh : लोकसभा निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने भाजपला धूळ चारली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. पण आता त्यांच्यासमोर धर्मसंकट उभे ठाकले आहे. हे नेते आहेत अखिलेश यादव आणि राहुल गांधी.

राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील रायबरेली आणि केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. वायनाडमधून त्यांनी सलग दुसरा विजय मिळवला आहे. तर रायबरेलीमध्ये सोनिया गांधी राज्यसभेवर गेल्याने राहुल यांना उमेदवारी देण्यात आली होती. तिथेही त्यांनी साडे तीन लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला.

नियमानुसार राहुल यांना कोणत्याही एकाच मतदारसंघाचे सदस्य राहता येणार आहे. त्यामुळे एका मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. मागील निवडणुकीत राहुल यांचा अमेठीमध्ये पराभव झाला होता. त्यामुळे रायबरेलीतील विजयाबाबत धाकधूक होती. पण येथील मतदारांनी पुन्हा एकदा गांधी कुटुंबासोबतच असल्याचे दाखवून दिले.

अमेठी पराभव होत असताना वायनाडने राहुल यांना साथ दिली होती. मागीलवेळी ते चार लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले होते. तर यावेळीही त्यांच्या विजयाचे अंतर तब्बल 3 लाख 90 हजार एवढे आहे. हा मतदारसंघ 2009 पासून काँग्रेसच्या मागे उभा राहिला आहे. त्यामुळे रायबरेली आणि वायनाड हे दोन्ही मतदारसंघ राहुल यांच्यासाठी महत्वाचे आहे.

Rahul Gandhi, Akhilesh Yadav
Mamata Banerjee : ममतादीदींचे ‘खेला होबे’! शपथ घेण्याआधीच पाच खासदार देणार भाजपला धक्का?

अखिलेश खासदार राहणार की आमदार?

अखिलेश यादव यांच्या पक्षाने निवणुकीत जोरदार मुसंडी मारत 37 जागा जिंकल्या आहेत. तेही कन्नौज लोकसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तसेच ते सध्या करहल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनाही आमदार किंवा खासदारकीचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यामुळे अखिलेश यांच्यासमोरही धर्मसंकट आहे.   

...तर दोन जागांवर पोटनिवडणूक

राहुल यांनी रायबरेली आणि अखिलेश यांनी कनौज मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला तर या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक होऊ शकते. उत्तर प्रदेशात इंडिया आघाडील मोठे यश मिळाले आहे. अशावेळी पुन्हा पोटनिवडणूक होऊ नये, अशीच दोन्ही पक्षांतील नेत्यांची मानसिकता असल्याचीही एकीकडे चर्चा आहे. त्यामुळे राहुल वायनाडचा आणि अखिलेश आमदारकीचा राजीनामा देऊ शकतात. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com