
Ajit Pawar News : विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये महाविकास आघाडीची मोठी पिछेहाट झाली. मात्र, या निकालाबाबत संशय व्यक्त केला जातो आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील आपल्या भाषणात अजित पवारांना येवढ्या जागा कशा मिळाल्या? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे 'स्वतःच्या मुलाला निवडून आणता आलं नाही, आणि ते इतरांना सल्ले देत आहेत', अशा शब्दांत अजित पवारांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला.
अजित पवार म्हणाले, 'आम्हाला लोकसभेला 17 जागा मिळाल्या 31 नाहीत. त्यावेळी आम्ही रडत बसलो नाही. तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला सांगता. मागे मला लोकसभेच्या निवडणुकीला मुलाला आणि दुसऱ्या निवडणुकीला पत्नीला निवडून आणता आलं नाही. लोकांनी कौल दिला. त्यात ईव्हीएममध्ये काही गडबड झाली नाही.
राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत वाढलेल्या मतदारसंख्येवर शंका व्यक्त केली होती. पाच वर्षात जेवढे मतदार वाढले नाहीत त्यापेक्षा अधिक पाच महिन्यात वाढले असे राहुल गांधी म्हणाले होते. त्यावर अजित पवारांनी त्यांना टोला लगावला. अजित पवार म्हणाले, त्यांना येवढं वाटत असेल तर त्यांनी तपासणीसाठी स्वतःटी टीम लावावी. दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल असल्याने हे रडगाणं सुरू आहे.
धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला होता. यावर धनंजय मुंडेंवर कारवाई होणार का असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवारांना विचारला असता ते म्हणाले, अंजली दमानिया आणि धनंजय मुंडे या दोघांनी आपली बाजु मांडली आहे. आरोपांची शहानिशा केली जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.