
Mumbai News : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आज (ता.17) राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेली जशाच तसे उत्तर दिले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला देखील उत्तर दिले आहे. यावेळी अजित पवार यांनी, जयंत राव स्वत: हा अर्थमंत्री राहिले असून त्यांच्याकडून अशा शब्दांची अपेक्षा नव्हती, अशी खंत व्यक्त केलीय.
राज्याचा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांच्या नावे नवा विक्रम झाला. त्यांनी त्यांच्या राजकीय कार्यकाळातील 11वा अर्थसंकल्प मांडला. यावेळी जयंत पाटील यांनी महायुतीच्या या अर्थसंकल्पावर जोरदार टीका केली. तसेच अजितदादांनी तब्बल 46 हजार कोटी रुपयांच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडल्याचे सांगत हा ही एक विक्रमच असल्याचे म्हटले होते. या तुटीच्या अर्थसंकल्पामुळे आपल्या मंत्रालयाच्या बजेला कट लागणार, असे प्रत्येक मंत्र्यांच्या मनात धास्ती आता आली आहे. यामुळे अर्थमंत्र्यांकडे येतानाच मंत्री ‘दादा, माझे पैसे कट करू नका,’ असे सांगत आहेत. आता मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना अजितदादांना शरण गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मंत्रिमंडळातील तुम्ही सर्व मंत्री शरण गेला तरच तुमच्या खात्याला कपात लागणार नाही. मी या खेळातील फार जुना खेळाडू आहे, अशा शब्दांत जयंत पाटील यांनी विधानसभेत फटकेबाजी केली होती.
याच फटकेबाजीला अजित पवार यांनी विधानसभेत जशाच तसे उत्तर देताना चारोळ्यांचा आधार घेतला. तसेच सत्ताधाऱ्यांसह विरोधकांचे आभार मानताना. विरोधकांचे चिमटे देखील काढले आहेत. यावेळी विरोधकांवर चारोळीतून निशाना साधला आहे. काही लोकांसाठी हा अर्थसंकल्प नवा असून त्यावर संतुलित तर काहींनी टोक्याच्या टीका केल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी...
ऐकल्या, शिव्या दुनियेच्या,
जाहली, जरी बदनामी,
हे काय, कमी मजसाठी
मी तुम्हा, आवडलो आहे! असे म्हणत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेवर जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुक करताना टीकेला झालर घालत असतात. हा त्यांचा स्वभाव आहे. पण त्यांनी, सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण गेल्याशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य केलं होतं. त्यामुळे मला एक कळत नाही की, इतक्या वेळेला ते अर्थमंत्री होते. पण त्यावेळेला अर्थमंत्र्यांना दुसरे मंत्री शरण जायचं असतं का? त्यांच्यासारख्या व्यक्तीकडून अशा प्रकारच्या शब्दांचा उल्लेख होणे अपेक्षीत नव्हते, अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
तर आम्ही नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी देखील आमच्यात एकी असल्याचं सांगत आलो आहे. आमच्यात वाद नसल्याचेही सांगितलं आहे. पण वेगवेगळ्या पद्धतीने बातम्या रंगवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्याला काहीही अर्थ नाही. एकंदरीत हा अर्थसंकल्प मांडल्यानंतर ‘बडा घर पोकळ वासा’, ‘मारल्या थापा भारी, केला महाराष्ट्र कर्जबाजारी’ असंही काहीजणांनी टीका केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.