Maharashtra Political News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जनगणनेसोबतच जातीय जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला. भाजपाने हा निर्णय घेताना आपल्या धक्का तंत्राच्या परंपरेची पुन्हा एकदा आठवण करून दिल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे. तर दुसरीकडे या निर्णयाचा संबंध बिहार विधानसभा निवडणुकीशी जोडला जात आहे. काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षाने या निर्णयाचे स्वागत करताना याचे श्रेय घेण्याचाही प्रयत्न चालवला आहे.
काँग्रेसचे लातूर शहरचे आमदार अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी या संदर्भात सोशल मिडियावर व्यक्त होताना जातीय जनगणनेचा निर्णय म्हणजे काँग्रेस विचारसरणीचा विजय असल्याचा दावा केला आहे. केंद्रातील मोदी सरकारने जरी जातीय जनगणनेचा निर्णय आता घेतला असला तरी याची मागणी काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी अनेक वर्षांपासून करत होते, असा दावा अमित देशमुख यांनी केला आहे.
केंद्र शासनाने अखेर देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एक वर्षापूर्वी लोकसभा निवडणूकी दरम्यान काँग्रेस (Congress) पक्षाने न्यायपत्र नावानं जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या न्यायपत्रात काँग्रेसने सामाजिक, आर्थिक आणि जातीय जनगणना करण्याचे आश्वासन दिले होते. निवडणुकीनंतरही काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीजी यांनी जातीय जनगणनेचा विषय सातत्याने लावून धरलेला आहे.
केंद्र शासनाने आता या संदर्भाने निर्णय घेऊन काँग्रेस पक्ष आणि राहुलजी गांधी यांच्या सामाजिक न्यायाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तबच केले आहे. सत्ताधारी मंडळींनी माझा कितीही अपमान केला तरी देशात जातीय जनगणना करून घेण्यासाठी मी त्यांना एक दिवस बाध्य करीन, असा निर्धार लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी यांनी अनेक वेळा बोलून दाखवला होता, अखेर केंद्र शासनाने आता देशात जातीय जनगणना करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
त्यामुळे जातीय जनगणनेला विरोध करणारी सत्ताधारी मंडळीच आता मात्र जातीय जनगणनेच्या निर्णयाचे गोडवे गाऊ लागले आहेत. एका अर्थाने काँग्रेस विचारसरणीचा हा मोठा विजय आहे असे मी मानतो आहे, अशा शब्दात अमित देशमुख यांनी या निर्णयामागे काँग्रेस नेत्यांचा पाठपुरावा आणि दबाव होता, हे अधोरिखीत करण्याचा प्रयत्न केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.