

महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी दिसून येत आहे.
बंडखोरी टाळण्यासाठी मिरा-भाईंदरमध्ये भाजपने इच्छुकांकडून एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उमेदवारी न मिळाल्यासही पक्षाशी निष्ठावंत राहण्याचा हा प्रयोग सध्या चर्चेत आहे.
Mumbai News : महानगरपालिका निवडणूक जाहीर होताच सर्वपक्षांमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू झाल्या आहेत. यात सर्वात जास्त इच्छुक भारतीय जनता पक्षात दिसून येत आहे. एका जागेसाठी अनेक इच्छुकांनी दंड थोपटले आहेत. यामुळे भाजपच्या पक्ष कार्यालयाबाहेर रांगा लागायला सुरुवात झाली आहे. यामुळे बंडखोरीचाही मोठा धोका भाजपला समोर दिसत आहे.
यावर उपाय म्हणून मिरा-भाईंदरमध्ये भाजपने नामी शक्कल शोधली आहे. महापालिकेच्या ९५ जागांसाठी आतापर्यंत ३६० इच्छुकांनी पक्षाकडे मुलाखत दिली आहे. भाजपचे आमदार नरेंद्र मेहता, जिल्हाध्यक्ष दिलीप जैन, माजी उपमहापौर हसमुख गेहलोत यांनी मुलाखती घेतल्या आहेत.
यात उमेदवाराची राजकीय, सामाजिक पार्श्वभूमी, निवडून येण्याची क्षमता तसेच खर्च करण्याची क्षमता या बाबी तपासल्या जात आहेत. त्याचवेळी 95 जागांसाठी भाजपकडे 360 हून अधिक अर्ज आल्याने बंडखोरीची भीती आहे. त्यामुळे मुलाखतीनंतर प्रत्येकालाच "उमेदवारी मिळाली नाही तरी पक्षाशी एकनिष्ठ राहणार" अशी शपथ घेण्यास सांगितले जात आहे.
मी शपथ घेतो, की...
पक्षाच्या विचारधारेला मानणारे असून पक्षाशी एकनिष्ठ असून उमेदवारी मिळाली नाही तरीदेखील निवडणुकीत पक्षासाठीच काम करू, तसे न केल्यास आपण पक्षाशी बेईमान आहोत, अशी शपथ इच्छुकांना घ्यावी लागत असून त्याचे चित्रीकरण केले जात आहे. पण केवळ कार्यकर्त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहावे, हीच यामागची अपेक्षा आहे असे, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप जैन यांनी स्पष्ट केले.
अर्ज मागे घेण्याचे आवाहन
महापालिका निवडणुकीत ९५ पैकी भाजपने ६२ जागा निवडून आणून एकहाती सत्ता स्थापन केली. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाले आहे. त्यातच भाजपला नुकत्याच बिहारमध्ये मिळालेल्या यशामुळे कार्यकत्यांमध्ये उत्साह वाढला आहे. चार सदस्यीय प्रभागात भाजपकडून सात ते आठ जण निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत.
त्यामुळे इच्छुक उमेदवारांकडून शपथ वदवून घेतली जात आहे. तर निवडून देण्याची शक्यता नसलेल्या काही इच्छुकांकडून मुलाखत अर्जही मागे घेण्याचे आवाहन पक्षाकडून केले जात आहे.
1. भाजपने उमेदवारांकडून शपथ का घेतली?
➡️ उमेदवारी न मिळाल्यास होणारी बंडखोरी व नाराजी टाळण्यासाठी ही शपथ घेण्यात आली आहे.
2. ही शपथ कुठे घेतली जात आहे?
➡️ मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखतीदरम्यान ही शपथ घेतली जात आहे.
3. भाजपमध्ये इतकी गर्दी का दिसत आहे?
➡️ एका जागेसाठी अनेक इच्छुक असल्याने भाजप कार्यालयाबाहेर रांगा लागल्या आहेत.
4. ही शपथ कायदेशीर बंधनकारक आहे का?
➡️ नाही, ही पक्षशिस्त राखण्यासाठीची अंतर्गत प्रक्रिया आहे.
5. या निर्णयाचा निवडणुकीवर काय परिणाम होऊ शकतो?
➡️ बंडखोरी कमी होऊन पक्ष अधिक संघटितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.