
Mumbai News : मुंबई हायकोर्टाने गुरूवारी भाजपच्या आमदार चित्रा वाघ यांची जनहित याचिका निकाल काढली. महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात त्यांनी ही याचिका दाखल केली होती. पुण्यात 2021 मध्ये एका तरुणीच्या मृत्यूप्रकरणी राठोडांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी वाघ यांनी याचिकेतून केली होती.
मुंबई हायकोर्टाने आता याचिका निकाली काढल्याने राठोड यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्य न्यायाधीश आलोक आराधे आणि न्यायाधीश भारती डांगरे यांच्या खंडपीठाने ही याचिका निकाली काढत प्रकरण बंद केले. चित्रा वाघ यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी केली होती. तसेच हे प्रकरण तपासासाठी सीबीआयला आदेश देण्याची मागणी केली होती.
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात वाघ यांनी याचिका निकाली काढण्याबाबत कोर्टाला विनंती केली होती. त्यानंतर कोर्टाने त्यांना चांगलेच धारेवर धरले होते. परिस्थितीनुसार भूमिका बदलण्याबाबत कोर्टाने नाराजी व्यक्त केली होती. मात्र, तरुणीच्या वडिलांनी दाखल केलेली हस्तक्षेप याचिका आणि पोलिसांनी दिलेल्या क्लोजर रिपोर्टच्या आधारे कोर्टाने गुरूवारी याचिका निकाली काढली.
पुण्यातील महंमदवाडी भागातील एका इमारतीवरून पडल्याने तरुणाची मृत्यू झाला होता. ही घटना 2021 मधील आहे. तरुणीच्या मृत्यूला संजय राठोड जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. तर राठोड मंत्री मंत्री होते.
प्रामुख्याने भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्याविरोधात रान उठवले होते. राठोड यांच्याकडून आपला या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचा दावा केला जात होता. मात्र, विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.