Mumabi News : मनोज जरांगे यांची केस २०१३ ची आहे. मागच्या काळात देखील त्यांच्यावर असा वॉरट निघाला होता. ते तारखेला गेले तर त्यांच्यावरील वॉरंट रद्द होईल. मागच्या वेळी ते माझ्या आईवर बोलले होते, मग त्यांनी माफी मागितली होती. आता पण उपोषणावर बसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे.
फडणवीस यांच्यामुळे कुणाला धोका आहे हे सर्वाना माहिती आहे. ती इकोसिस्टीम कोण चालवत आहे, हे देखील सर्वांना माहीत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी स्पष्ट केले. उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांचे संतुलन बिघडले असून त्यांचा संताप होतोय, अशी टीका त्यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी प्रसार माध्यमाशी संवाद साधला. आताच सीबीआयने जी चार्जशिट दाखल केली आहे. त्यामध्ये सांगितले आहे की, गिरीश महाजन यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करा. याचे ऑडिओ पुरावे मी स्वतः दिले होते. त्यानंतर केस दाखल झाली होती. सीडी आणि पुराव्यासकट चार्जशीट दाखल केले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
श्याम मानव मला इतकी वर्ष ओळखत आहेत. त्यांनी आरोप करण्याआधी मला विचारायला हवे होते. इकोसिस्टीममध्ये अलीकडे सुपारीबाज लोक घुसले आहेत. शाम मानव त्या मंडळींच्या नादी लागले आहेत का ? असा प्रश्न मला पडतो आहे, असेही फडणवीस म्हणाले.
अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर एफआयआर त्यांच्या सरकारच्या काळात दाखल झाले आहे. ते बेलवर बाहेर आलेले आहेत. ते सुटलेले नाहीत. मी आजवर बोललो नव्हतो, ते आरोप करत आहेत. मी कुणाच्या नादी लागत नाही आणि लागलो तर मी त्याला सोडत नाही.
त्यांच्या काळातील त्यांच्या लोकांनी माझ्याकडे काही ऑडिओ दिले आहेत. ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर काय बोलले हे पुरावे माझ्याकडे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.