Bharat Gogawale : पालकमंत्रिपदाचा तिढा कायम! रायगडचा विकास रखडणार? भरत गोगावले एका वाक्यात म्हणाले, 'काहीही झाले...'

Raigad Guardian Ministership Challenge : रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असून दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठका झालेल्या नाहीत. यामुळे जिल्ह्यांच्या विकास रखडणार? अशी शंका आता व्यक्त केली जातेय.
Bharat Gogawale
Bharat GogawaleSarkarnama
Published on
Updated on

Raigad News : राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत आले असून जिल्ह्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील नियुक्त करण्यात आले आहेत. मात्र रायगडसह नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. यावर अद्याप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणताच निर्णय घेतलेला नाही. यामुळे जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठका झालेल्या नाहीत. यामुळे जिल्ह्यांच्या विकास रखडणार? अशी शंका आता व्यक्त केली जातेय. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी ही शंका खोडून काढली आहे.

यावरून भरत गोगावले यांनी, जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम आहे. तो सुटेल तेंव्हा सुटेल. आपल्याकडे पद आले नाही आले तरी जिल्ह्याच्या विकासावर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. जे होईल ते चांगलं होईल. जी काही तांत्रिक अडचणी आहेत त्या लवकरच दूर होतील असेही, गोगावले यांनी म्हटलं आहे.

ज्या वेळी रायगडच्या पालकमंत्री नियुक्त होईल, त्याच वेळी एक दोन दिवसांत जिल्ह्याचा कृती आराखडा तयार केला जाईल, त्यावर बैठक लावली जाईल आणि पुढच्या गोष्टी विस्तृत करून घेतल्या जातील, असेही गोगावले यांनी म्हटलं आहे.

Bharat Gogawale
Bharat Gogawale : गोगावलेंनी दिलेली डेडलाईन संपली; ना बैठक ना चर्चा, भरतशेठ यांची इच्छा काय पुरी होईना....

नियोजन मंडळाच्या कोकण मंडळातून रायगड वगळण्यात आल्यानेच जिल्ह्याचा विकास रखडणार अशी शक्यता व्यक्त होत आहे. याच शक्यतेवर गोगावले यांनी स्पष्ट शब्दात आपली प्रतिक्रिया दिली आहे. तर पालकमंत्रिपदावर आपले ठाम मत व्यक्त करताना, हे पद आपल्यालाच मिळेल असे संकेत देखील त्यांनी दिले आहेत. तर पद मिळो अथवा न मिळो जिल्ह्याचा विकास थांबणार नाही, असे भाष्य केलं आहे.

Bharat Gogawale
Bharat Gogawale : भरत गोगावले यांचा फुगा फुटला, पालकमंत्रीपद राष्ट्रवादीच्या वाट्याला; गोगावले यांची नाराजी

दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी देखील पालकमंत्रिपदावरून मध्यंतरी भाष्य केलं होते. त्यांनी याचा निर्णय महायुतीचे तिन्ही नेते घेतील. ते याबाबत बैठक घेतील आणि आपला निर्णय घेतील. मुख्यमंत्री फडणवीस जो निर्णय घेतली तो मान्य असेल, असे म्हटले होते. तर लोक फळ देणाऱ्याच झाडाला दगड मारतात अशा टोला देखील त्यांनी जिल्ह्यातील विरोधकांना लगावला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com