

रत्नागिरी जिल्ह्यातील धामापूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी उमेदवार जाहीर केले.
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीत अजूनही जागावाटप निश्चित झालेले नाही.
राष्ट्रवादीच्या या निर्णयामुळे महायुतीत अंतर्गत वाद निर्माण झाला असून भाजप-शिवसेनेवर मात केल्याची चर्चा सुरू आहे.
Ratnagiri News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा बिगूल वाजला असून महायुतीमध्येच जोरदार रस्सीखेंच पाहायला मिळत आहे. तर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपांची चर्चा झालेली नाही. अशातच रत्नागिरी जिल्ह्यातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांनी एकीकडे उमेदवारी देताना सामाजिक समतोल राखण्यात येईल, महायुतीमध्ये लढण्यासाठी कार्यकत्यांनी आतापासून आपापल्या भागामध्ये कामाला सुरुवात करावी. एक दिलाने महायुतीचे उमेदबार निवडून आणण्यासाठी सर्वच कार्यकत्यांनी एकजुटीने प्रयत्न करावेत असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. तर दुसरीकडे धामापूर गटातून उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. यामुळे आता जिल्ह्यात राष्ट्रवादीने भाजप-शिवसेनेवर मात केल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीसह नगरपंचायती आणि नगरपरिषदांच्या निवडणुकींसाठी मोर्चे बांधणी सुरू झाली आहे. महायुतीमध्ये राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेकडून जिल्ह्यात सध्या युतीचाच नारा दिला जात आहे. पण आतून स्वबळाची चाचपणी तिन्हीही पक्ष करताना दिसत आहेत. तसा नारा देखील मध्यंतरी भाजप आणि राष्ट्रवादीने दिला होता. ज्यावर शिवसेना नेते मंत्री उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली होती.
या दरम्यान आमदार शेखर निकम यांच्यासह मंत्री उदय सामंत यांनी आपले स्वबळाच्या नाऱ्यातून माघारी घेत युती असे म्हणणे सुरू केले आहे. पण आता आमदार शेखर निकम यांनी धामापूर गटातून सुशील भायजे व वांजोळे गटातून मंगेश चांडांगळे यांच्या नावावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिक्कामोर्तब केला आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार शेखर निकम यांच्या उपस्थितीत पार पाडला. यावेळी या नावांची घोषणा करण्यात आली.
या मेळाव्यात निकम यांनी, आगामी निवडणुका महायुती महणून लढवण्याचा व जिंकण्याचा निर्धार कार्यकत्यांनी आतापासून करावी. त्यासाठी आपापल्या भागामध्ये कामाला सुरुवात करावी. एक दिलाने महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वच कार्यकत्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करावी. उमेदवार कोणीही असला, तरी त्याला निवडून आणणे हे प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. तर उमेदवारी देताना सामाजिक समतोल राखण्यात येईल, असेही निकम यांनी म्हटले आहे.
1. शेखर निकम यांनी कोणत्या गटातून उमेदवार जाहीर केले?
धामापूर गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी उमेदवार जाहीर केले.
2. महायुतीत जागावाटपावर चर्चा झाली आहे का?
नाही, अद्याप महायुतीत जागावाटप निश्चित झालेले नाही.
3. या घोषणेवर इतर पक्षांची प्रतिक्रिया काय आहे?
भाजप आणि शिवसेनेत नाराजी असून महायुतीत वाद वाढण्याची शक्यता आहे.
4. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या निर्णयाचा काय परिणाम होऊ शकतो?
स्थानिक स्वराज्य निवडणुकांपूर्वी राष्ट्रवादीचा प्रभाव वाढू शकतो आणि महायुतीतील मतभेद तीव्र होण्याची शक्यता आहे.
5. अजित पवार गटाने हा निर्णय का घेतला?
स्थानिक स्तरावर पक्ष मजबूत करण्यासाठी आणि निवडणुकीपूर्वी नेतृत्व दाखवण्यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.