

मंगेश काळोखे यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आल्याचा स्पष्ट निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.
या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना रायगड पोलिसांनी अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सुधाकर घारे व भरत भगत यांचा सहभाग अद्याप आढळलेला नसून तपास अंतिम टप्प्यात आहे.
Raigad News : खोपोलीतील शिवसेना नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्येप्रकरणात मोठ्या घडामोडी समोर येत आहेत. अशातच आज नवव्या दिवशी त्यांच्या दोन्ही मुली आणि पुतण्या पहिल्यांद बोलता झाला असून त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दिवंगत काळोखे यांच्या मुलींनीतर त्यानांही मारण्याचा प्लॅन हल्लेखोरांचा होता असा दावा केला आहे. या दाव्यानंतर रायगडमध्ये एकच खळबळ उडाली असतानाच आता रायगडच्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी मोठा माहिती समोर आणली आहे.
त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आल्याचे सांगत काळोखे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटलं आहे. तर या हल्ल्यात संशयीत असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नसल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या स्पष्टीकरणामुळे आता पोलिसांकडून घारे आणि प्रवक्ते भगत यांना क्लिनचिट दिली की काय अशी चर्चा रायगडच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नवनिर्वाच नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या राजकीय वैमनस्यातून करण्यात आली होती. ज्यानंतर राज्यभर संताप पसरला आहे. तर या हत्येचे खरे सुत्रधार राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत असल्याचा गंभीर आरोप याआधीच शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. पण आता या बाबत मोठी उपडेट समोर आली आहे.
या घटनेच्या नवव्या दिवशी काळोखे कुटुंबांनी एकत्र येत या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे. तसेच काळोखेंच्या दोन्ही मुलींनी आक्रोश करत मोठा दावा केला आहे. त्यांनी प्रसार माध्यमांशी पहिल्यांदाच बोलताना आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. तर हल्लेखोरांनी या दोन्ही मुलींनाही ठार मारण्याची धमकी दिली होती असा धक्कादायक खुलासा त्यांनी केलाय. यामुळे रायगडसह राज्यभर खळबळ उडाली असून या हत्या प्रकरणात पुन्हा राजकीय वळण येण्याची शक्यता वर्तवली जात होती.
अशातच आता पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि प्रवक्ते भरत भगत यांचा या गुन्ह्यात अद्याप तरी सहभाग आढळून आलेला नाही, अशी माहिती दिली आहे. तसेच त्यांनी या प्रकरणाचा अद्याप तसाप सुरू असून तो अंतिम टप्प्यात आहे. तसेच काळोखे यांची हत्या सुपारी देऊनच करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याचे म्हटलं आहे. त्या या प्रकरणाशी संबंधीत अटक करण्यात आलेल्यांबाबत माहिती देत असताना बोलत होत्या.
कोणाला अटक?
26 डिसेंबर रोजी माजी नगरसेवक मंगेश काळोखे यांची हत्या करण्यात आली होती. मुलींना शाळेत सोडून घरी परतत असताना अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. तर त्यांचा पाठलाग करून तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीने वार केले होते. या हल्ल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाले होते. एकीकडे निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना दिवसाढवळ्या अशी हत्या करण्यात आल्याने खोपोली शहरासह रायगड जिल्हा हादरला होता. आतापर्यंत या प्रकरणात रवींद्र देवकर, धनेश देवकर, दर्शन देवकर, सचिन चव्हाण यांच्यासह 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
Q1. मंगेश काळोखे हत्या प्रकरणात किती जणांना अटक झाली आहे?
➡️ आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
Q2. ही हत्या कोणत्या प्रकारे करण्यात आली होती?
➡️ ही हत्या सुपारी देऊन, म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट किलिंग असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Q3. पोलिसांनी ही माहिती कोणी दिली?
➡️ रायगड पोलीस अधीक्षक आँचल दलाल यांनी ही माहिती दिली आहे.
Q4. सुधाकर घारे आणि भरत भगत यांचा सहभाग आहे का?
➡️ सध्या तरी त्यांचा सहभाग आढळलेला नाही, मात्र तपास सुरू आहे.
Q5. या प्रकरणाचा तपास कुठपर्यंत पोहोचला आहे?
➡️ तपास अंतिम टप्प्यात असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.