
चिपळूणमध्ये झालेल्या बैठकीत उदय सामंत यांनी महायुतीतील काही नेत्यांवर उघडपणे टीका केली.
सामंत यांनी भाजप आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना शिवसेनेला कमी लेखू नका असा इशारा दिला.
त्यांनी शिवसैनिकांना “शिवसेना काय आहे ते दाखवण्याची जबाबदारी तुमची” असे सांगून उत्साह दिला.
Chiplun News : राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. यामुळे आता महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, स्थानिक प्रशानासनासह राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. स्थानिकमध्ये आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावण्यासाठी राजकीय पक्ष पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरण्याची चाचपणी करत आहेत. अशातच तळकोकणात महायुतीतच स्वबळाच्या घोषणा दिल्या जात आहेत. यावरून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते तथा पालकमंत्री उदय सामंत यांनी मित्र पक्षातील काही पदाधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी, कोणाला खुमखुमी असेल तर त्यांनी एकदाचे जाहीर करावे. मग धनुष्यबाण (शिवसेनेचं निवडणूक चिन्ह) कसा चालतो ते देखील आम्ही दाखवून देऊ, असे म्हटलं आहे. तर हा स्वबळाचा नारा देणाऱ्या भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सामंत यांनी आक्रमक शैलीत उत्तर दिले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या अध्यक्ष पदासह गट आणि गणांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. तर नगरपरिषदा, नगरपंचायती आणि वॉर्डचे आरक्षणाची घोषणाही झाली आहे. आता मतदार याद्या तयार करण्याचे काम सुरू असून निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर शनिवारी चिपळूण येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा उदय सामंत यांनी घेतला. या मेळ्याव्यात सामंत यांनी, आगामी स्थानिकबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भूमिका ही महायुती म्हणून निवडणुका लढवाण्याची आहे. पण महायुतीमधीलच काही पिल्लावळ महायुती होऊ नये म्हणून प्रयत्न करत आहेत, असा आरोप केला आहे.
तर जे असे म्हणत आहेत त्यांना,आता आपल्याला देखील शिवसेना काय आहे हे तितक्याच आक्रमकपणे दाखवून द्यावे लागणार आहे. आणि हे सगळ्या पदाधिकाऱ्यांनी दाखवून द्यावे असे म्हणत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला आहे. मागिल काही दिवसांत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्थानिकसाठी स्वबळाचा नारा दिला जात आहे. नुकताच राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल आणि आमदार शेखर निकम यांनी महायुतीतील जागा वाटपावरून निशाना साधत स्वबळाचा नारा दिला होता. यावरून आता सामंत यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी, जर कोणाला खूमखुमी असेलच तर आमचा धनुष्यबाण कसा चालतो हे त्यांना दाखवावे लागेल अशा शब्दात सुनावले आहे.
तालुक्यात काहीजण सध्या स्वबळाची भाषा करत आहेत. काहीजण, आम्ही स्वबळावर निवडणुका लढू आणि जिंकून दाखवू, आम्ही जिंकलेलोच आहोत. आमच्याकडे अमुक संस्था, तमुक संस्था आहेत. आम्ही लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलो आहोत, अमुक तमुक शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून आम्ही हजारो लोकांपर्यंत पोहोचलो आहोत. त्यामुळे जवळपास आमचा विजय निश्चित असल्याची भाषा वापरत आहेत. पण माझी सर्वांना एकच विनंती आहे की आपल्याला महायुतीतूनच निवडणुका लढवायच्या आहेत, असेही सामंत यांनी म्हटलं आहे.
तर मित्र पक्षांचे कान टोचताना, जर शिवसैनिकांनी विधानसभेच्या निवडणुकीला प्रामाणिकपणे काम केलं नसते, तर असा सवाल केला आहे. तसेच आम्ही कामच केलं नसते तर काय झाले असते हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाही चांगलेच माहिती आहे. हे निवडून आलेल्या उमेदवारांना ही माहिती आहे. त्यामुळे किमान त्यांनी तरी अशी भाषा करू नये अशा खरमरीत शब्दात आमदार शेखर निकम यांचे नाव न घेता टोला लगावला आहे.
तर भाजपवासी झालेल्या प्रशांत यादव यांच्याही वक्तव्यावरून सामंतांनी आग पाखड केली आहे. त्यांनी, काही लोकांना पंधरा दिवसांपूर्वी शिंदे साहेब चांगले होते. माझ्याबरोबर माझे मोठे बंधू किरण (भैया) सामंत यांच्याबद्दलही आपुलकी अन् प्रेम होते. पण आता त्यांची चौकशी लागेल म्हणून जे दुसऱ्या पक्षात गेले. त्यांनी शिवसेनेला डिवचण्याचा कोणी प्रयत्न करू नये. अन्यथा शिवसेना काय आहे हे दाखवू असेही सामंत यांनी म्हटलं आहे.
तर महायुतीत आगामी स्थानिकबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त तिन्ही पक्ष प्रमुखांना असून तो मलाही नाही. दरम्यान दोनच दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी मेळाव्यातही महायुतीचाच भगवा फडकवायचा असल्याचे भाष्य केलं आहे. त्यामुळे काल-परवा महायुतीमध्ये बाहेरून आलेल्यानी असे भाष्य करू नये असेही सामंत म्हटले आहे.
1. उदय सामंत यांनी कोणत्या बैठकीत वक्तव्य केले?
चिपळूण येथे झालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य केले.
2. त्यांनी कोणावर टीका केली?
भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांवर त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली.
3. त्यांच्या वक्तव्यात नेमके काय म्हटले?
“महायुती होऊ नये म्हणून काहीजण प्रयत्न करत आहेत, अशांना धनुष्यबाण दाखवावा लागेल” असे त्यांनी म्हटले.
4. हे वक्तव्य कोणत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाले?
कोकणातील नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर.
5. या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया आल्या का?
होय, या वक्तव्यामुळे महायुतीत मतभेद वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.