Ladki Bahin Yojana : एका कागदामुळे 42 लाख लाडक्या बहि‍णी अडकल्या; अपात्र लाभार्थी फडणवीस सरकारच्या रडारवर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचा तब्बल 42 लाख अपात्र लाभार्थी महिलांनी लाभ घेतला असून लाभाचा आकडा 6 हजार 800 कोटी आहे.
Majhi Ladki Bahin Yojana
Majhi Ladki Bahin YojanaSarkarnama
Published on
Updated on

Ladki Bahin Yojana : विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने जाहीर केलेली लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. अवघ्या दीड महिन्यात 2 कोटी 57 लाख महिलांनी योजनेसाठी अर्ज केले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी किमान 3 ते 4 हप्ते जमा व्हावेत अशी सरकारची धडपड होती. अशातच अपेक्षेपेक्षा जास्त अर्ज आल्याने आणि हातात वेळ कमी असल्याने सरकारी पातळीवरून प्रचंड गडबड सुरु झाली. हीच गडबड आता सरकारच्या अंगलट आली आहे. 11 महिन्यात तब्बल 42 लाख अपात्र लाडक्या बहि‍णींनी योजनेला लाभ घेतला असून लाभाचा आकडा 6 हजार 800 कोटींच्या घरात आहे.

सरकारने लाडकी बहीण योजनेतील अर्जांच्या पडताळणीसाठी पालकमंत्र्यांच्या शिफारशीवरून अर्जाच्या तपासणीसाठी सरकारने अशासकीय सदस्यांच्या समित्या नेमल्या. समितीचा अध्यक्ष मात्र अशासकीयच राहिला. या समित्यांमध्ये तहसीलदार, जिल्हाधिकारीही होते. तत्कालीन विद्यमान आमदारांसह इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात मोठमोठे अभियान राबवून महिलांचे अर्ज भरून घेतले. अर्ज करताना स्वतःचे आधारकार्ड, बँक पासबुक, रेशनकार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी किंवा शाळेचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, १५ वर्षांपूर्वीचे मतदानकार्ड, हमीपत्र व फोटो अपलोड करण्याचे बंधन होते.

निवडणुकीनंतर राज्य सरकारने या योजनेतील अर्जांची काटेकोर पडताळणी सुरु केली. या पडतळणीत परराज्यातील महिला, सरकारी नोकदार महिलांसह, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, इतर सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या महिला, घरी चार चाकी असणाऱ्या महिला, घरात दोनपेक्षा जास्त लाभार्थी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. अगदी 14 हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचे पडताळणीतून समोर आले. अशा तब्बल 42 लाख लाभार्थ्यांनी तब्बल 6 हजार 800 कोटींचा लाभ घेतला आहे.

Majhi Ladki Bahin Yojana
ladki Bahin Yojana : रक्षाबंधनला लाडक्या बहि‍णींना डबल गिफ्ट; जुलैसोबत ऑगस्टचाही अ‍ॅडव्हान्स मिळणार!

पण आता हे पैसे वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे. यासाठी योजनेचा अर्ज भरताना दिलेल्या एका डॉक्युमेंटचा आधार सरकारकडून घेतला जाणार आहे. अर्ज भरताना प्रत्येक लाभार्थ्याकडून स्वयंघोषणापत्र भरून घेण्यात आले होते. हे सदर योजनेच्या अटी आणि शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र होते. भविष्यातील डोकेदुखी टाळण्यासाठी या हमीपत्र, स्वयंघोषणापत्राचा आधार घेऊन अपात्र लाभार्थ्यांकडून वसुली केली जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात वरिष्ठ स्तरावर विचारविनिमय सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com