Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आलेल्या अपयशाची जबाबादारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारत राजीनामा देण्याची तयारी दाखवली. त्यासाठी सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याने सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणीसांच्या राजीनाम्या देण्याच्या इच्छेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'टीम म्हणून चांगल काम झालं आहे. सामुहिक जबाबादारी आहे. त्यांनी (फडणवीस) भावना व्यक्त केली असेल मात्र मी त्यांच्याशी बोलणार आहे. जे निकाल आले ते कोणा एकट्याची जबाबदारी आहे, असे मी मानत नाही. ही सगळ्यांची सामुहिक जबाबादारी आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.'
'निवडणुकांमध्ये हारजीत होत असते. महाविकास आघाडी आणि आमच्या मतांची टक्केवारी सारखी आहे. मुंबईत आम्हाला मतं जास्त आहेत. मुंबईतील मराठी माणसाची मतं ही महायुतीला मिळाली असल्याचे मतांच्या टक्केवारीवरून दिसते आहे', असे मुख्यमंत्री म्हणाले.
महाराष्ट्रात आम्हाला अपेक्षित यश मिळाले नाही. अपेक्षा पेक्षा खूप कमी जागा मिळाल्या आहेत, अशी कबूली देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आमची लढाई महाविकास आघाडीसोबत होती तशी ती नरेटी विरोधात होती. संविधान बदलणार नरेटीव्ह विरोधात होती.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.