Shrikant Shinde : ''...म्हणून आपण 54 लाख कुणबी दाखले देऊ शकतोय'' ; श्रीकांत शिंदेंचं माध्यमांसमोर विधान!

Manoj Jarange : मनोज जरांगेच्या 'चलो मुंबई'च्या घोषणेवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
Shrikant Shinde
Shrikant ShindeSarkarnama
Published on
Updated on

Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी बीड मधील इशारा सभेतून मराठा समाजाला चलो मुंबईची हाक दिली आहे. 20 जानेवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर मनोज जरांगे बेमुदत उपोषण सुरू करणार आहेत आणि यासाठी आंतरवालीतून ते समाजबांधवासह मुंबईच्या दिशेने पायी निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

खासदार श्रीकांत शिंदे म्हणतात, ''आतापर्यंत मनोज जरांगे(Manoj Jarange) पाटील यांनी जे जे सांगितल आहे त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आणि एकूण सरकारने मराठा समाजाला आरक्षण कसं मिळेल, जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे मिळतील यासाठी पहिल्या दिवसापासून प्रामाणिक प्रयत्न केले आहेत.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Shrikant Shinde
EKnath shinde News : मनोज जरांगेंच्या 'मुंबई चलो'च्या घोषणेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

याशिवाय, ''कोणत्याही प्रकारची चाल ढकल केली नाही, त्याचीच प्रचिती म्हणून 54 लाख कुणबी दाखले आपण देऊ शकतोय. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे. मुख्यमंत्री वारंवार हेच सांगत आहेत मराठा समाजाला जे टिकेल तेच आरक्षण दिलं गेलं पाहिजे.'' असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

याचबरोबर ''क्युरेटीव्ह पिटीशन कोर्टाने स्वीकारली आहे. कधी असं होत नाही क्युरेटीव्ह पिटीशन स्वीकारतं, पंरतु ती आता न्यायालयाने स्वीकरली आहे. त्यातून मराठा समाज हा मागास कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.

सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे, वारंवार जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधत आहे. येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यावर सरकार भर नक्कीच देईल.'' अशी माहितीही श्रीकांत शिंदे(Shrikant Shinde) यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

Shrikant Shinde
Maratha Reservation : मनोज जरांगेंचा बीडच्या सभेतून मराठा लोकप्रतिनिधींना सूचक इशारा, म्हणाले...

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत 24 डिसेंबर रोजी संपत आहे. तत्पूर्वी शनिवार मनोज जरांगेची बीडमध्ये इशारा सभा पार पाडली. या सभेला प्रचंड जनसमुदाय उसळला होता, या सर्वांच्या साक्षीने मनोज जरागेंनी आंदोलनाच्या पुढील दिशेची घोषणा केली आणि इशाराही दिला.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com