Aurangabad Railway Station: औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं नाव बदलणार! शासनाची मंजुरी, राजपत्र प्रसिद्ध

Aurangabad Railway Station: या नाव बदलाचं गॅझेट देखील जारी करण्यात आलं आहे. त्यामुळं आता लवकरच या रेल्वे स्टेशनचं नावही बदललं जाणार आहे.
Aurangabad
Aurangabad
Published on
Updated on

Aurangabad Railway Station: औरंगाबाद रेल्वे स्टेशनचं आता नाव बदलणार असून राज्य शासनानं यासाठी मंजुरी दिली आहे. या नाव बदलाचं गॅझेट देखील जारी करण्यात आलं आहे. त्यामुळं आता लवकरच या रेल्वे स्टेशनचं नावही बदललं जाणार आहे.

Aurangabad
Hasan Mushrif : शौमिका महाडिकांचा मोर्चा मुश्रीफांच्या जिव्हारी..!

औरंगाबाद शहराचं नामकरण छत्रपती संभाजीनगर झालं असलं तरी रेल्वे स्थानकाचं नामकरण झालं नव्हतं. आता महाराष्ट्र शासनानं केंद्रीय अधिनियमान्वये यासंदर्भात नियम व आदेश लागू करत ‘छत्रपती संभाजीनगर’ नाव रेल्वे स्थानकाला देण्यासंदर्भात राजपत्र जारी केलं आहे. त्यामुळं आता लवकरच औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव 'छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन' असं होणार आहे.

Aurangabad
Dilip Mane On Congress : भाजपत जाता जाता माजी आमदाराने काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यात अंजन घातले; ‘माजी आमदार असूनही हर्षवर्धन सपकाळ मला...’

असं झालं नामकरण

दरम्यान, मविआचं सरकार असताना २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी २९ जून रोजी औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराचं नाव बदलून अनुक्रमे संभाजीनगर आणि धाराशीव असं केलं होतं. शिवसेनेची बऱ्याच काळापासून या शहरांची नाव बदलण्याची मागणी होती. त्यामुळं जशी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तसा ही शहराची नावं बदलण्याच्या निर्णय उद्धव ठाकरेंकडून घेण्यात आला. पण एका विशिष्ट परिस्थितीत हा निर्णय घेतला गेला.

२२ जून २०२५ रोजी शिवसेनेत सर्वात मोठं बंड होऊन एकनाथ शिंदे आपल्या ४० समर्थक आमदारांसह बाहेर पडले त्यामुळं शिवसेनेचं विधीमंडळातलं संख्याबळ कमी झालं. त्यामुळं ठाकरे मुख्यंमत्री असलेलं मविआचं सरकारचं कोसळलं. पण किमान समान कार्यक्रमानुसार काँग्रेसला या नामांतराला विरोध असतानाही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी शिवसेनेची अनेक वर्षींची मागणी म्हणून औरंगाबादचं नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचं नाव धाराशीव असं करण्यास मंत्रीमंडळाची मंजुरी करुन घेतली.

Aurangabad
मतदार याद्या घोळ? निवडणुकीपूर्वी भाजपला अडचणीत आणणारे कोण आहेत देवांग दवे

पण नंतर ठाकरेंचं सरकार जाऊन एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपनं एकत्र येत सरकार स्थापन केलं. या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बनले त्यानंतर औरंगाबाद शहराला दिलेलं संभाजीनगर या नावात त्यांनी पुन्हा बदल करुन ते छत्रपती संभाजीनगर असं केलं. सुरुवातीला केवळ शहराच्या नावात तसा बदल झाला त्यानंतर जिल्हा पातळीवर नावात बदल केला गेला आणि आता रेल्वे स्थानकाचं औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर असं करण्यात आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com