Bjp : फडणवीसांनी शिवसेनेला `संभाजीनगर`ची आठवण पुन्हा करून दिली..

औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? त्यासाठी लागणारा दोन ओळीचा ठराव शिवसेना सभागृहात का आणू शकत नाही? (Devendra Fadanvis)
Bjp Leader Devendra Fadanvis
Bjp Leader Devendra FadanvisSarkarnama

औरंगाबाद : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अर्थसंकल्पावरील चर्चेवर बोलतांना आज शिवसेनेला चांगलेच डिवचले. (Aurangabad) आधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ५७ टक्के निधी राष्ट्रवादीला आणि मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेला (Shivsena)फक्त १६ टक्के दिल्याचे आकडेवारीसह सभागृहात मांडले आणि त्यानंतर औरंगाबादचे संभाजीनगर करण्यासाठी सभागृहात दोन ओळीचा ठराव का आणत नाही? असे विचारत जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला. (Devendra Fadanvis)

फडणवीस यांनी अर्थसंकल्पाची चिरफाड करतांनाच सत्ताधारी पक्षात भांडण लावण्याचाही प्रयत्न केला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाला अर्थसंकल्पातून सर्वाधिक निधी दिल्याचे सांगत शिवसेनेची सरकारमध्ये काय किंमत आहे? असा सवाल उपस्थित केला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी शिवसेनेला लक्ष्य करत त्यांच्यासाठी अडचणीचे ठरणारे विषय सभागृहात उपस्थित करत कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव असे नामांतर करण्याचा विषय शिवसेनेच्या कायम अजेंड्यावर होता. राज्यात १९९५ मध्ये जेव्हा युतीचे सरकार आले तेव्हा औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला होता. परंतु त्यानंतर सत्तांतर होऊन राज्यात काॅंग्रेस आघाडीचे सरकार आले आणि तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी तो ठराव विखंडित केला.

शिवाय या ठरावाविरोधात न्यायालयात याचिका झाल्याने देखील हे नामांतर रखडले. परंतु त्यानंतर येणाऱ्या प्रत्येक निवडणूकीत शिवसेनेकडून औरंगाबादचे संभाजीनगर करण्याचा मुद्दा उपस्थित केला जायचा. महापालिका निवडणुकीत तर शिवसेनेसाठी हा मुद्दा मते खेचण्यासाठीचे प्रमुख अस्त्र होते. २०१४ मध्ये पुन्हा राज्यात युतीचे सरकार आले, पण संभाजीनगरचा प्रश्न मात्र काही मार्गी लागला नाही.

Bjp Leader Devendra Fadanvis
मेळाव्याला परवानगी नाकारली, मुस्कान खानलाही शहरात येण्यास बंदी ; वंचित कोर्टात..

आता तीन पक्षांच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेकडे मुख्यमंत्री पद आहे, तेव्हा औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? असा प्रश्न भाजपकडून सातत्याने विचारला जातो. अर्थसंकल्पावरील चर्चेत फडणवीस यांनी आज हा मुद्दा सभागृहात पुन्हा उपस्थितीत केला. औरंगाबादचे संभाजीनगर कधी करणार? त्यासाठी लागणारा दोन ओळीचा ठराव शिवसेना सभागृहात का आणू शकत नाही? असा टोला लगावत फडणवीस यांनी शिवसेनेची कोंडी केल्याचे यावरून दिसून आले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com