Manoj Jarange Patil Protest : मनोज जरांगेंनी दिल्लीही हलवली..; कौन है मनोज जरांगे?

Manoj Jarange Patil Protest : . "दिल्लीत अनेकांनी मला 'काैन है मनोज जरांगे'असा प्रश्न विचारला होता," असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Manoj Jarange
Manoj Jarange Sarkarnama

Jalna : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे नाव काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात बहुतेकांना माहिती झालंय. मुख्यमंत्री आल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या जरांगेंनी देशाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सोळा दिवसांपासून उपोषण सुरू होते. आज (गुरुवारी) मुख्ममंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी जात जरांगेंचे उपोषण सोडले. आमरण उपोषण करणाऱ्या जरांगेंचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं.

Manoj Jarange
CM Shinde On Reservation: कुणावरही अन्याय न करता मराठ्यांना आरक्षण देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच दिल्लीला गेले होते. या ठिकाणी मराठा आरक्षणाच्या उपोषणाची माहिती अनेक जण घेत होते. "दिल्लीत अनेकांनी मला 'काैन है मनोज जरांगे'असा प्रश्न विचारला होता," असे मुख्यमंत्री म्हणाले.

मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला आहे. 17 दिवसांनंतर मनोज जरांगे यांचे उपोषण सुटले असून, त्यांनी दवाखान्यात दाखल होण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विनंतीदेखील मान्य केली आहे. त्यानुसार मनोज जरांगे आता दवाखान्यात उपचार घेणार आहेत. या आंदोलनामुळे मनोज जरांगे कोण आहेत हे जाणून घेऊयात..

कोण आहेत मनोज जरांगे?

  • मनोज जरांगे याचे मूळ गाव शिरूर कासार तालुक्यातील मातोरी (जि. बीड). या गावात त्यांची छोटी शेती आहे. मातोरी येथे शेतजमीन कमी असल्यामुळे जरांगे हे त्यांची सासरवाडी असलेल्या समर्थ कारखाना येथे राहण्यास गेले.

  • पत्नी, चार मुलं, तीन भाऊ आणि आई-वडील असा त्यांचा परिवार आहे. सुरुवातीला कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केलं असल्याची माहिती आहे.

  • जालना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनं करणारे जरांगे पाटलांचं शिक्षण बारावीपर्यंत झाले आहे. त्यांनी मराठा आरक्षणासाठी चार एकरपैकी दोन एकर जमीन विकून टाकली.

  • जालन्यात काही काळ त्यांनी काँग्रेसमध्येही काम केले. शिवबा संघटनेच्या माध्यमातून महानाट्याच्या निमित्ताने ते प्रसिद्धीस आले. 2014 मध्ये शाहगड ते मुंबई पायी फेरी व छत्रपती संभाजीनगर येथील त्यांच्या नेतृत्वाखालील मोर्चाही गाजला होता.

  • साष्ट पिंपळगाव येथे त्यांनी केलेल्या आंदोलनाची तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी बोलावलं होतं. वडीकाळ्या आणि भांबेरी या गावांत त्यांनी केलेल्या आंदोलनाची दखल सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही घेतली होती.

    Edited By : Mangesh Mahale

Manoj Jarange
Sarkarnama Podcast : लातूरकरांचा चिमटा, मातब्बराचा पराभव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com