Santosh Deshmukh : हत्या, खंडणीखोरी अन् गुंडगिरी...; संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे दिल्लीतील मराठी साहित्य संमेलनात पडसाद

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद दिल्लीत सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उमटल्याचं पाहायला मिळालं.
Santosh Deshmukh
Santosh DeshmukhSarkarnama
Published on
Updated on

Santosh Deshmukh Murder Case : संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद दिल्लीत सुरू असलेल्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan) उमटल्याचं पाहायला मिळालं.

मराठवाडा साहित्य परिषदेने मराठवाड्यातील विविध मुद्द्यांवरून मांडलेल्या ठरावावरून साहित्य संमेलनाच्या बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती आहे. परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू आणि बीडमधील (Beed) सरपंच संतोष देशमुख यांची हत्या, मंत्र्यांवरील भ्रष्टाचाराचे आरोप आणि खंडणीखोरी हे मराठवाड्याला लागलेले ग्रहण आहे.

Santosh Deshmukh
Mahayuti News : शिंदेंच्या मंत्र्यांची मुख्यमंत्र्याकडे तक्रार; अजितदादांच्या शिलेदाराला मोठा दणका

मराठवाड्याचे हे चित्र बदलण्यासाठी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी राजकारणाचा विचार न करता मराठवाड्यातील गुंडगिरी संपवण्याची हमी द्यावी, अशी मागणी करणारा ठराव मराठवाडा साहित्य परिषदेने मांडला.

संमेलनाच्या समारोपाच्या पूर्वसंध्येला महामंडळाच्या बैठकीत संमेलनात मांडण्याच्या ठरावांवर चर्चा केली जाते. या बैठकीत मराठवाडा (Marathwada) साहित्य परिषदेने मराठवाड्यातील विविध मुद्यांबाबत ठराव मांडला. यामध्ये बीड आणि परभणीतील हत्या आणि मृत्यू प्रकरणाचा समावेश आहे.

Santosh Deshmukh
Pratap Sarnaik : आधी कन्नडिगांना दम भरला; आता मंत्री सरनाईकांचा मोठा निर्णय, कर्नाटकला जाणाऱ्या बसेसबद्दल दिली मोठी अपडेट

मात्र, आपण केवळ साहित्यिक विषयांवर चर्चा करूया. सामाजिक-राजकीय विषयांवर नको, अशी भूमिका महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. यावर संमेलनात राजकीय-सामाजिक विषयांवरील परिसंवाद घेतले जातात. मग ठराव का नकोत? असा सवाल मराठवाडा साहित्य परिषदेने उपस्थित केला. त्यामुळे आता महामंडळ हा ठराव स्वीकारणार का? हे संमेलनाच्या समारोपावेळी स्पष्ट होईल.

दरम्यान सामाजिक विषयांवर संवेदनशीलतेने भूमिका घेणे आवश्यक असल्याचं मत मराठवाडा साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष डॉ. रामचंद्र काळुंखे यांनी व्यक्त केलं. ते म्हणाले, "एकीकडे आपण दुर्गाबाई भागवत यांच्यासारख्या साहित्यिकांची परंपरा अभिमानाने मिरवतो आणि दुसरीकडे राजकीय-सामाजिक विषयांवर भूमिका घेत नाही. हे योग्य नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com