Maratha Reservation : राजेंद्र राऊतांच्या विशेष अधिवेशनाच्या मागणीवर चंद्रकांतदादांनी दिली महत्वाची माहिती...

Special Assembly Session : विशेष अधिवेशनाच्या मुद्यावर राजेंद्र राऊत यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केलेली आहे.
Chandrakant Patil-Rajendra Raut-Manoj Jarange Patil
Chandrakant Patil-Rajendra Raut-Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 14 September : मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मुद्यावर विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केली आहे. त्यासाठी आमदार राऊत यांनी विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांना पत्र लिहिले आहे. आमदार राऊत यांच्या मागणीवर सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्वपूर्ण माहिती आहे. अधिवेशनाच्या निर्णयाचा चेंडू त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला आहे.

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे आज धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्यांची भेट घेण्यासाठी पंढरपूरमध्ये आले होते. त्या वेळी त्यांनी राजेंद्र राऊत यांच्या मागणीवर विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे स्पष्ट केले.

मराठा समाजाच्या आरक्षण संदर्भात (Maratha reservation ) विशेष अधिवेशन घेण्याचे अद्याप निश्चित नाही. विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना एक पत्र द्यायचं असतं. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिवेशन बोलवावं किंवा न बोलवाव, त्याबाबतचा निर्णय घेतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पंढरपुरात बोलताना दिली.

Chandrakant Patil-Rajendra Raut-Manoj Jarange Patil
Dhangar Reservation : जरांगेंसमोर लोटांगण घालता अन्‌ आम्हाला 10 मिनिटेही देऊ शकत नाही का?; धनगर उपोषणकर्त्यांचा मंत्र्यांना सवाल

दरम्यान, विशेष अधिवेशनाच्या मुद्यावर राजेंद्र राऊत यांनी सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी ओबीसीतून मराठा आरक्षण देण्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केलेली आहे. अधिवेशनासंदर्भात सरकारी पातळीवरून आणखी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाही. त्यावर आज प्रथमच चंद्रकांत पाटील बोलले आहेत.

राऊतांचे मुख्यमंत्र्यांनाही पत्र

आमदार राजेंद्र राऊत यांनी राजेंद्र राऊत यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. त्यात पत्रात त्यांनी मुलीच्या शैक्षणिक शुल्कमाफीसंदर्भात मागणी केली आहे.

Chandrakant Patil-Rajendra Raut-Manoj Jarange Patil
Dhangar Reservation : मंत्र्यांसोबतची बैठक निष्फळ; धनगर समाजाचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासवर्ग (एसईबीसी) व इतर मागासवर्ग (ओबीसी) प्रवर्गातील मुलींना सरकारने या वर्षीपासून शैक्षणिक व परीक्षा शुल्क शंभर टक्के माफ केले आहे. त्याच पद्धतीने या प्रवर्गातील उच्च उत्पन्न गटातील मुलींसंदर्भातही शैक्षणिक आणि परीक्षा शुल्क माफीचा निर्णय घ्यावा, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com