
धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार एका कार्यक्रमात नाचगाण्यात गुंतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने पूरग्रस्त आणि शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी हा व्हिडिओ स्वतः पाहिलेला नसल्याचे सांगत, जिल्हाधिकाऱ्यांबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव घेतील असे स्पष्ट केले.
मंत्री कदम यांनी शेतकऱ्यांना आत्महत्या न करण्याचे आवाहन करून, सरकार आर्थिक मदत देईल अशी ग्वाही दिली.
Solapur, 26 September : सोलापूरसह मराठवाड्यात मुसळधार पावसाने हाहाकार उडालेला असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती पुजार हे एका कार्यक्रमात नाचगाण्यात गुंतले असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. शेतकरी आणि पूरग्रस्तांना मदतीची गरज असताना जिल्हाधिकारी डान्स करत असल्याचे पाहून संताप व्यक्त केला जात आहे. त्यावर गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी ‘नाचगाण्यात व्यस्त असलेल्या धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव निर्णय घेतील’ असे स्पष्ट केले आहे.
सोलापूर, धाराशिव (Dharashiv), बीड, लातूरला अतिवृष्टीचा जोरदार फटका बसला आहे. शेतीपिकांसह जमीनही वाहून गेल्याने बळीराजा अक्षरशः रस्त्यावर आला आहे. तसेच, अनेकांच्या घरांत महापुराचे पाणी शिरल्याने अनेकांना जीव वाचविण्यासाठी सर्व काही सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे. अशा लोकांची खाण्याची भ्रांत आहे. घरातील धनधान्ये, चीजवस्तू सर्व महापुराच्या पाण्यात वाहून गेले आहे. सर्वस्व हरवलेल्या पूरग्रस्तांना मदतीची अपेक्षा आहे.
बळीराजाला आणि पूगग्रस्तांना सरकारी पातळीवरून मदतीचा हात देण्याची अपेक्षा असताना जिल्हाधिकाऱ्यांसारखे महत्वाचे अधिकारी नाचगाण्यात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी (Collector) किर्ती पुजार यांचा एका कार्यक्रमात नाचगाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त होत आहे.
याबाबत सोलापूरच्या दौऱ्यावर आलेले गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले, जिल्हाधिकाऱ्याच्या व्हिडिओबाबत मला माहिती नाही. तो व्हिडिओ मी पाहिलेला नाही. काही वेळापूर्वी त्यांनी खुलासा केला आहे की नाचणारी व्यक्ती मी नाही. मी बाजूला उभा होतो, मी फक्त टाळ्या वाजवल्या. मी नाचलो नाही.
जिल्हाधिकाऱ्यांसोबत निर्णय घेण्याचे अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव राजेशकुमार मीना यांचे आहेत. ते जिल्हाधिकाऱ्यांबाबत योग्य तो निर्णय घेतील, असे सांगून योगेश कदम यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा विषय मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात ढकलला.
मंत्री कदम म्हणाले, सांस्कृतिक महोत्सवात अशा गोष्टी टाळायला हव्या होत्या. कारण या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करण्याला प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे. शेतकरी संकटात असताना त्याला बाहेर काढण्यासाठी लक्ष दिले पाहिजे.
बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येबाबत योगेश कदम यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की मोठे संकट ओढवले आहे, मात्र टोकाचे पाऊल उचलू नका. सरकार आपल्या पाठीशी शंभर टक्के उभे आहे. आपल्याला आर्थिक ताकद दिली जाईल. आर्थिक मदतीबाबत मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील.
प्र: कोणत्या जिल्हाधिकाऱ्यांचा नाचगाण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला?
उ: धाराशिव जिल्हाधिकारी कीर्ती पुजार.
प्र: या प्रकरणावर अंतिम निर्णय कोण घेणार आहे?
उ: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्य सचिव राजेशकुमार मीना.
प्र: कीर्ती पुजार यांनी स्वतःबद्दल काय स्पष्टीकरण दिले?
उ: ते नाचले नाहीत, फक्त बाजूला उभे राहून टाळ्या वाजवल्या.
प्र: शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत योगेश कदम यांनी काय आवाहन केले?
उ: टोकाचे पाऊल न उचलता सरकारकडून मदत मिळेल, असा विश्वास ठेवावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.