
Pune News : पालकमंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता. 3) जिल्हा नियोजन बैठक झाली. यावेळी 2024-2025 चा जिल्ह्याचा 250 कोटींचा आराखडा आहे. पण प्राप्त 155 कोटींमधून केवळ 32 कोटी खर्च झाल्याने पालकमंत्र्यांसह राणे पिता-पुत्रांनी झाडाझडती घेतली. यावेळी पालकमंत्री नीतेश राणे उर्वरित निधी कधी आणि कसा खर्च करणार, अशी प्रश्नांची सरबत्ती जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर केली.
पहिल्याच बैठकीत पालकमंत्री राणे यांनी, प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेताना, प्रशासन प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांचा वचक राहिला नसून यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांच्या प्रशासकीय कारभाराचे वाभाडे काढताना, किती खर्च केला याचे उत्तर द्या असे खडसावले. तर आम्ही सर्वजन जनतेचे सेवक असून जनतेच्या कामांसाठी, जिल्ह्याच्या विकासासाठी जे करता येईल ते करू. पण आता अधिकाऱ्यांच्या कामातील चालढकलपणा लाचणार नाही. ते खपवून घेणार नाही, असा इशाराच पालकमंत्र्यांनी दिला आहे.
जिल्हाधिकारी यांच्यावर तोफ डागताना जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी तुमच्यावर असताना खर्च किती व कसा झाला याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना द्यायला हवा.प्रशासनाने 15 टक्केच खर्च कसा केला असा सवाल करताना, जिल्हा परिषद प्रशासन झोपा काढत आहे का? आता असा प्रकार येथून खपवून घेतलं जाणार नाही, असं मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांना खडसावलं आहे.
आमदार राणे यांनी, जिल्हा परिषदेचा एक अधिकारी कामांना प्रशासकीय मान्यता देत नाही. ग्रामस्थांच्या तोंडावर कागद फेकून मारतो, असा मुद्दा उपस्थित केला. तर अशा अधिकाऱ्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कोणती भूमिका घेणार असा सवाल करताना, आम्हालाही कागद तोंडावर फेकून मारता येतात. याआधी पाच प्रकरणे कानावर आली असून आता ती सांगितली तर त्याला घरी जावे लागेल, असा इशारा दिला आहे. त्यावरून त्या अधिकाऱ्याने सॉरी म्हणण्याचा करताच खासदार राणे यांनी, मुख्य कार्यकारी अधिकारी देशमुख यांना अशा अधिकाऱ्यांना जिल्ह्यात ठेवू नका, असे आदेश दिले आहेत.
जिल्हा नियोजन बैठक कृषी विभागाला शून्य टक्के निधी ठेवल्याने आमदार राणे चांगलेच आक्रमक झाले. तसेच त्यांनी, जिल्ह्यातील नागरिकांना कृषी क्रांती करायची नाही की जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आता असा सवाल केलाय.
यावेळी पालकमंत्री राणे यांनी जल जीवन मिशन योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा थेट आरोप करताना, कामे पूर्ण न करताच बिले काढली जात असल्याचा दावा केला आहे. तर सध्या जिल्ह्यात जी कामे सुरू आहेत त्याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतला आहे का? असा सवाल करताना आतातरी एखादी बैठक लावा असे म्हणत प्रशासनाला दंडवत घालायचा का असेही म्हटलं आहे.
दरम्यान कणकवली येथील लॉजवर बांगलादेशी महिला सापडल्या असताना त्या रेल्वे स्टेशनवर सापडल्या, असे दाखविणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली जाणार असे संकेत पालकमंत्री राणे यांनी दिले आहेत. तर तीन लाखांची तडजोड करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे आदेश कोकण परिक्षेत्राचे आयजी यांना दिल्याचे पालकमंत्री राणे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.