Kolhapur Water Distribution : अपुऱ्या माहितीमुळे कागलकरांचा विरोध; इचलकरंजीकर म्हणाले, हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे

Kolhapur News : इंचलकरजीला पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुळकूट योजनेला कागल तालुक्यातून विरोध होत आहे.
Kolhapur Water Distribution :
Kolhapur Water Distribution :Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : इंचलकरंजीला पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेल्या सुळकूट योजनेला कागल तालुक्यातून विरोध होत आहे. अपुऱ्या माहितीच्या आधारे कागलकर पाणी देण्यास विरोध करत असल्याचे सांगत इचलकरंजीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, अशी भावना इचकरंजीतून व्यक्त होत आहे.

सुळकूट योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने इचलकरंजी शहराला कागल तालुक्यातील दूधगंगा नदीचे पाणी देण्यास मंजुरी दिली. त्यासाठी 160 कोटी रुपयेही मंजूर केले, पण या योजनेला दूधगंगा नदी काठावरील गावातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध केला आहे. या विरोधामुळे इचलकरंजीकरांची चिंता वाढवली आहे. या योजनेच्या विरोधात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, समरजीतराजे घाटगे, संजय घाटगे असे कागलचे सगळेच नेते एकवटल्याने ही योजना रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही योजना रद्द झाली तर इचलकरंजीला पाण्याचा दुसरा मार्ग नाही. त्यामुळे दूधगंगा नदीतील पाण्यावर आमचाही हक्क आहे. त्यामुळे हे पाणी मिळालंच पाहिजे अशी भूमिका इचलकरंजीतील लोकांनी घेतली आहे.

Kolhapur Water Distribution :
Parbhani Political News : बावनकुळेंनी रासपचा आमदारच गळाला लावला, थेट उमेदवारी जाहीर

दुसरीकडे, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार सुरेश हळवनकर यांनी यासाठी ठोस भूमिका घेऊन या योजनेचा पाठपुरावा करत आहेत. मात्र विरोध वाढल्याने लोक नाराजी व्यक्त होत आहे. काल कागलचे नेते जिल्हाधिकारी यांना भेटल्यानंतर इचलकरंजीत सोशल मीडियावर प्रतिक्रिया उमटल्या. कागलकराच्या भूमिकेबद्दल नाराजी व्यक्त होत आहे. पाणी आमच्या हक्काच नाही कुणाच्या बापाचं असा सुर होता. हसन मुश्रीफ आणि कागलच्या इतर नेत्यांबद्दलही नाराजी व्यक्त होत आहे.

Kolhapur Water Distribution :
इचलकरंजी महापालिकेची दशकभराची मागणी २ वर्षांत पूर्ण! खासदार मानेंचा निर्णायक पाठपुरावा

  काही वर्षापर्यंत पंचगंगा नदीतून इचलकरंजी शहराचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जायचा. पण पंचगंगेची प्रदूषणाची पातळी वाढल्याने इचलकरंजीला या प्रदूषणाचा फटका बसू लागला. या पाण्यामुळे अनेकांनी आपले प्राणही गमावले. इचलकरंजीची पाण्याची तहान भागवण्यासाठी दुधगंगा नदीचे पाणी मिळण्याची मागणी होऊ लागली, तेव्हापासून कागलकर आणि इचलकरंजी करांमध्ये पाणी प्रश्न पेटला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com