
शिर्डी : शिर्डी विमानतळा (Shirdi Airport) शेजारी असलेल्या काकडी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शिर्डी लगतच्या असणाऱ्या गावांना स्मार्ट सिटी अंतर्गत विकास करण्याच्या कामाल मंजुरी दिली. त्यामुळे शिर्डीतील काकडी ग्रामस्थच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, पंधराशे एकर जमीन विमानतळाला देऊन तीन वर्षे उलटून गेली. असतानासुद्धा ग्रामस्थांना फक्त आश्वासनच दिली जात आहे.
शिर्डी विमानतळाच्या परिसरातील गावे विकसित करावीत. सर्व सुविधायुक्त शहर बसवण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी. महाराष्ट्रतील एक उत्तम विकास केंद्र याठिकाणी बसवावे, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या. मात्र, त्याचे पुढी काहीच होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
शिर्डी विमानतळ तयार होताना कवडीमोल दराने आम्ही आमच्या जमिनी दिल्या. मात्र, आज विमान प्राधिकरण आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे. काकडी ग्रामपंचायतचा थकलेला साडेपाच कोटी रुपयांचा कर अजूनही दिला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जर पंधरा दिवसात ग्रामपंचायतचा विमानतळा कडून येणारा थकीत कर मिळाला नाही तर विमानतळाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा काकडी गावचे सरपंत पूर्वा गुंजाळ यांनी दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.