Shahuwadi Crime: कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील शिरगाव येथील सरपंच सुरेखा शिवाजी न्यारे (वय ५०) यांचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी भिवंडी पोलिसांनी मृत सुरेखा यांचा प्रियकर प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (४०) याला ताब्यात घेतले असून, या घटनेने गावासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित प्रकाश व सुरेखा हे शिरगावमध्ये एकाच गल्लीत समोरासमोर राहत असल्याने दोन्ही कुटुंबांमध्ये जवळीक होती. मागील अडीच वर्षे सुरेखा शिरगावच्या सरपंच म्हणून कार्यरत होत्या, तर "माझ्याशी लग्न कर" असे म्हणून सुरेखा वारंवार प्रकाशला धमकावत होती.
याच गोष्टीचा राग मनात धरून प्रकाशने सुरेखा यांच्या खूनाचा कट रचला. सुरेखा यांना "आपण पंढरपूरला जाऊया" असे सांगून प्रकाशने त्यांना आपल्या चारचाकी (एमएच ०९ जी झेड ६८१५) गाडीतून गावाबाहेरील लिंडोरी नावाच्या शेतात आणले.
तिथे प्रकाशचा जनावरांचा एक गोठा होता, याच गोठ्यामध्ये रविवारी (ता. २६) सकाळी साडेअकराच्या सुमारास प्रकाशने सुरेखा यांचा गळा दाबून खून केल्याची कबुली भिवंडी पोलिसांना दिली आहे.
खून केल्यानंतर त्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह मुंबई येथे दूरवर समुद्रात फेकून देण्याचा प्रकाशचा कट होता. त्यानुसार तो भिवंडी तालुक्यातील कशेळी येथे पोहोचला आणि त्याने भाचा संदेशला फोन करून पुढील कट सांगितला, परंतु भाच्याने या संपूर्ण प्रकाराची पोलिसांना माहिती दिल्याने प्रकाश भिवंडी पोलिसांच्या जाळ्यात अडकला असून नारपोली पोलिस ठाण्याकडून या प्रकाराची नोंद शाहूवाडी पोलिस ठाण्यात वर्ग झाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.